AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : जर तुम्हाला तुमचा पराभव समोर दिसत असेल, तर ही एक चूक कधीच करू नका

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटीनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य म्हणतात माणूस आपल्या आयुष्यात अशा काही चुका करतो, ज्या चुकांमुळे त्याच्यावर आयुष्यभर पश्चतापाची वेळ येते.

Chanakya Niti : जर तुम्हाला तुमचा पराभव समोर दिसत असेल, तर ही एक चूक कधीच करू नका
chanakya niti Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 04, 2026 | 9:55 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत, ते आजच्या काळातही कालबाह्य न वाटता उपयोगी वाटतात. चाणक्य म्हणतात अनेकदा आपल्या समोर अशी परिस्थिती असते, की आपल्याला संकटांनी चारही बाजुने घेरलेलं असतं. आपण एका संकटातून मार्ग काढतो, तोपर्यंत दुसरं संकट आपल्या समोर उभंच असतं, अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करावं हे आपल्याला कळत नाही. अनेकदा आपला शत्रू आपल्या पेक्षा बलवान असतो. मग अशा परिस्थितीमध्ये त्याच्याशी कसं लढावं असा प्रश्न देखील आपल्या मनाला पडतो. तर अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुमचं धैर्य. जर तुम्ही अशा बिकट परिस्थितीमध्ये खचला नाहीत, तर जगातील कोणतीही शक्ती तुमचा पराभव करू शकत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमका काय सल्ला दिला आहे? त्याबद्दल.

शत्रू बलवान असेल तर – चाणक्य म्हणतता जर तुमचा शत्रू हा तुमच्यापेक्षा अधिक बलवान असेल तर अशा परिस्थितीमध्ये खचून जाऊ नका. लक्षात ठेवा तुम्ही जर संयम ठेवलात तर तुम्ही आर्धी लढाई जिकलात म्हणून समजा. जर तुमचा शत्रू हा तुमच्यापेक्षा अधिक बलवान असेल तर त्याच्यासमोर ताकदीचा प्रयोग करण्याची चूक कधीही करू नका, त्यामुळे तुमचा पराभव होऊ शकतो, तर त्याला बुद्धीच्या जोरावर हरवा. मात्र त्यासाठी तुमच्या कडे संयम असणं गरजेचं आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जर तुम्हाला तुमच्या समोर पराभव दिसत असेल तर अशावेळी कधिही खचून जाऊ नका.  तुम्ही जर हार मानली जर नक्कीच तुमचा पराभव होऊ शकतो. त्यामुळे कधीही पराभव समोर दिसत असाताना हार माणून नका, तुम्ही पराभवातून देखील यश मिळू शकता, संकटाच्या काळात फक्त शांत राहा आणि परिस्थितीचं अवलोकन करा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...