AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूजेदरम्यान कोणत्या वस्तू पुन्हा वापरता येतात आणि कोणत्या नाही? जाणून घ्या ‘हे’ नियम

हिंदू धर्मात पूजा कठोर नियमांनुसार केली जाते. तर पूजा करताना कोणत्या वस्तूंचा पुनर्वापर करता येईल आणि कोणत्या वस्तु वापरता येणार नाही ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

पूजेदरम्यान कोणत्या वस्तू पुन्हा वापरता येतात आणि कोणत्या नाही? जाणून घ्या 'हे' नियम
pooja
| Edited By: | Updated on: Dec 23, 2025 | 4:51 PM
Share

आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक घराघरांमध्ये दररोज सकाळ व संध्याकाळ पूजा केली जाते. पूजा ही देवाशी जोडण्याचे आणि त्याचे आशीर्वाद प्राप्त करण्याचे एक साधन आहे. पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू पवित्र असतात. काही वस्तू देवाला अर्पण केल्यानंतरही शुद्ध राहतात, तर काही वस्तू पूजेमध्ये पुन्हा वापरल्या जात नाहीत. तर कोणत्या वस्तू पूजेमध्ये पुन्हा वापरता येतील तसेच कोणत्या वस्तू पुन्हा वापरता येणार नाहीत ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

या गोष्टी पूजेमध्ये पुन्हा वापरता येतात

चांदी, पितळ आणि या गोष्टी

धार्मिक श्रद्धेनुसार पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या चांदी, पितळ किंवा तांब्याच्या भांड्यांचा पुनर्वापर करता येतो. त्याचप्रमाणे, मूर्ती, घंटा, शंख, मंत्रमाळा आणि आसन यांचाही वारंवार वापर करता येतो. पूजेनंतर या वस्तू स्वच्छ करून सुरक्षितपणे देवघरात ठेवणे महत्वाचे आहे.

तुळस

हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व आहे. तुळशीची पूजा देवी लक्ष्मी म्हणून केली जाते. शिवाय तुळशीची पाने देखील पूजेमध्ये वापरली जातात. मान्यतेनुसार तुळस कधीही अपवित्र किंवा अशुद्ध नसते. म्हणून जर काही कारणास्तव नवीन तुळस उपलब्ध नसेल, तर आधीची पुजेदरम्यान अर्पण केलेली तुळस स्वच्छ पाण्यात धुऊन ती पुन्हा देवाला अर्पण करता येते.

बेलाची पाने

भगवान शंकर यांना बेलाची पाने खूप आवडतात. शिवपुराणात म्हटले आहे की बेलपत्र सहा महिने जुने होत नाही. शिवलिंगाला अर्पण केल्यानंतरही ते पुन्हा वापरता येते. बेलपत्र वापरताना ते तुटणार नाही फाटणार नाही किंवा त्यावर कोणतेही डाग पडणार नाहीत याची काळजी घ्या.

पूजेमध्ये या गोष्टींचा पुन्हा वापर करू नका

देवाला अर्पण केलेले नैवेद्य, पाणी, फुले आणि हार, चंदन आणि कुंकू, धूप आणि दिवे, नारळ आणि अखंड तांदळाचे दाणे आणि जळत्या दिव्यात उरलेले तेल किंवा तूप यांचा पूजेमध्ये पुन्हा वापर करू नये. मान्यतेनुसार, एकदा या वस्तू पूजेमध्ये वापरल्या की त्या शुद्ध राहत नाहीत. पूजेमध्ये या वस्तूंचा पुनर्वापर केल्याने त्यांचे पूर्ण फायदे मिळत नाहीत.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.