AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नदीत का फेकले जातात नाणे? असे आहे यामागचे कारण

तलावात किंवा नदीत देवतेच्या नावाची नाणी टाकल्याने माणसाची मनोकामना पूर्ण होते, अशी धार्मिक मान्यता आहे. नद्यांमध्ये नाणी फेकणे हा धर्माशी जोडला गेला कारण त्याकाळी लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून पटवणे फार कठीण होते.

नदीत का फेकले जातात नाणे? असे आहे यामागचे कारण
नदीत नाणे फेकण्यामागचे कारणImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 20, 2024 | 10:15 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मात दान आणि परोपकाराला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. पूजा असो, उपवास असो किंवा सण असो, प्रत्येक व्यक्ती दानधर्म नक्कीच करतो. दान करणाऱ्याला देव नेहमी आशीर्वाद देतो, असे मानले जाते, त्यामुळे लोक दानधर्मात पैसे दान करतात, पण अनेक लोक ती नाणी गरजू व्यक्तीला देण्याऐवजी नदी किंवा तलावात टाकतात. यामागे काही वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे (Religious Belief) आहेत. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या कारणांसाठी नदीत फेकले जातात नाणे

प्राचीन काळी नद्या हे पाण्याचे मुख्य स्त्रोत होते. आणि पिण्याच्या पाण्यासाठी फक्त नदीचे पाणी वापरले जायचे, त्यामुळे त्याकाळी मानवांसाठी नदीचे पाणी स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक होते. प्राचीन काळी, तांब्याची नाणी प्रचलित होती आणि तांबे धातू पाणी स्वच्छ आणि शुद्ध करण्याचे काम करतात. त्यामुळे नद्यांमध्ये पडलेली तांब्याची नाणी पाण्यात असलेले हानिकारक जीवाणू मारून टाकतात, म्हणूनच प्राचीन काळी लोक नद्यांमध्ये नाणी फेकत असत, जी पुढे परंपरा बनली. नद्यांचे पाणी शुद्ध राहावे हा या परंपरेमागे माणसाचा उद्देश होता.

या परंपरेला आणखी एक वैज्ञानिक कारण आहे. सध्या चांगल्या आरोग्यासाठी लोक तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून पितात, त्यामुळे तांब्याचे गुणधर्म पाण्यात येतात. त्याचप्रमाणे, प्राचीन काळी लोक तांब्याची नाणी नद्यांमध्ये टाकत असत जेणेकरून तांब्याचे घटक म्हणजे तांबे पाण्यात मिसळले जातील, जे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. या कारणास्तव, पाण्यात तांब्याचे प्रमाण वाढवण्यासाठी, लोक तांब्याची नाणी पाण्यात टाकतात जेणेकरून हे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

धार्मिक कारणे

तलावात किंवा नदीत देवतेच्या नावाची नाणी टाकल्याने माणसाची मनोकामना पूर्ण होते, अशी धार्मिक मान्यता आहे. नद्यांमध्ये नाणी फेकणे हा धर्माशी जोडला गेला कारण त्याकाळी लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून पटवणे फार कठीण होते. त्यामुळे ऋषी-मुनींनी या समस्येला धर्माशी जोडून त्यावर उपाय शोधून काढला की नदी किंवा तलावात देवदेवतांच्या नावाची नाणी टाकल्याने त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात.

कारण प्राचीन काळी लोक खूप धार्मिक होते आणि धर्माशी संबंधित प्रत्येक गोष्टीचे पालन करायचे. म्हणून, कोणत्याही चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास धार्मिक कारण फायदेशीर होते, प्राचीन काळी धर्माशी संबंधित होते. तसेच आपल्या ऋषीमुनींनी वैज्ञानिक सत्याला धर्माशी जोडले जेणेकरून जास्तीत जास्त लोक नदीत नाणी टाकतातत आणि पाणी शुद्ध राहते कारण स्वच्छ पाणी मानवी आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे.
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा.
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत 
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत .
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर......
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....