AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होळीच्या दिवशी शिवभक्त का पितात भांग? कशी सुरू झाली परंपरा?

अनेकांना होळीचा सण भांग शिवाय अपूर्ण वाटतो. शास्त्रानुसार, समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शिवाने विषाचे सेवन केले होते, त्यामुळे त्यांच्या शरीरात तीव्र जळजळ होऊ लागली..

होळीच्या दिवशी शिवभक्त का पितात भांग? कशी सुरू झाली परंपरा?
भांगImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 02, 2023 | 10:04 AM
Share

मुंबई : देशभरात होळीची तयारी सुरू झाली आहे. या वर्षी होळी (holi 2023) सण 8 मार्च 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. होळी सण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. ब्रजमधील होळी अनेक दिवस अगोदर सुरू होते. दुसरीकडे बनारसमध्ये होळीचा सण 2 ते 3 दिवस आधी सुरू होतो. होळीच्या खास प्रसंगी भांग पिण्याची परंपरा (Bhang History) फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. तुम्हाला माहीत आहे का विशेषतः होळीच्या दिवशी भांग का सेवन केले जाते.

होळीला भांग का पितात?

होळीमध्ये भांग पिण्याची परंपरा भगवान शिव आणि विष्णू यांच्याशी संबंधित आहे. असे म्हटले जाते की, हिरण्यकश्यप यांनी प्रल्हादला मारण्यासाठी विविध प्रयत्न केले परंतु त्यात ते यशस्वी झाले नाही. यानंतर हिरण्यकश्यपला मारण्यासाठी भगवान विष्णूने नरसिंह अवतार घेतला. हिरण्यकश्यपाचा वध करूनही भगवान नरसिंहाचा राग शांत झाला नाही.

त्यांना शांत करण्यासाठी भगवान शिवाने शरभ अवतार घेतला. भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराचा भगवान शिवाच्या शरभ अवताराने पराभव केला. यानंतर भगवान नरसिंहाचा राग शांत झाला आणि त्यांनी आपली साल भगवान शिवाला आसन म्हणून दिली. भगवान शिवाच्या विजयाच्या आनंदात कैलासावर एक उत्सव साजरा करण्यात आला आणि त्या दरम्यान भांग देखील वाटण्यात आली, जे पिल्यानंतर सर्व शिवभक्त डोलायला लागले आणि तेव्हापासून होळीच्या वेळी भांग पिण्याची प्रथा सुरू झाली.

ही देखील आहे ओळख

अनेकांना होळीचा सण भांग शिवाय अपूर्ण वाटतो. शास्त्रानुसार, समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शिवाने विषाचे सेवन केले होते, त्यामुळे त्यांच्या शरीरात तीव्र जळजळ होऊ लागली, त्यांचे शरीर थंड करण्यासाठी त्यांना पाणी, बेलपत्र आणि इतर सर्व वस्तू अर्पण केल्या गेल्या. यात भांग यांचा समावेश होता. म्हणूनच भगवान शिवाला प्रसाद म्हणून भांग अर्पण केले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.