AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नात नवरीला का लावली जाते मेहंदी? 99 टक्के लोकांना नाही माहिती यामागचे कारण

लग्नात मेंदी लावण्याच्या विधीला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. याशिवाय मेहंदीला सौंदर्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. या विधीमुळे वधूला तेज येते आणि तिचे सौंदर्य वाढते. मात्र याशिवाय आणखीही काही महत्त्वाचे कारण आहे.

लग्नात नवरीला का लावली जाते मेहंदी? 99 टक्के लोकांना नाही माहिती यामागचे कारण
मेहेंदीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 2:05 PM

मुंबई : भारतीय संस्कृतीत विवाहाला विशेष स्थान देण्यात आले आहे. भारतातील विवाह हा एका सामाजिक सणासारखा आहे ज्यामध्ये मुलगा आणि वेगवेगळ्या परंपरा आणि विधींचे पालन करून सहजीवनाला सुरूवात करतात. लग्नाच्या या विधींपैकी एक म्हणजे मेहंदी, ज्यामध्ये ती वधू आणि वरच्या हातांवर आणि पायावर लावली जाते. लग्नात मेहंदी (Importance of Mehendi)  लावण्याची प्रथा बहुतांश राज्यांमध्ये प्रचलित आहे. लग्नाच्या काही दिवस आधी हा विधी केला जातो. यामध्ये वधूच्या हातावर आणि पायावर मेहंदी लावून सुंदर डिझाइन्स बनवल्या जातात. हा विधी वधू आणि वरच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांद्वारे केला जातो.

मेहंदीच्या विधीला इतके महत्त्व का?

लग्नात मेंदी लावण्याच्या विधीला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. याशिवाय मेहंदीला सौंदर्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. या विधीमुळे वधूला तेज येते आणि तिचे सौंदर्य वाढते.  हिंदू धर्मात 16 अलंकारांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये मेहंदी देखील समाविष्ट आहे. मेहंदी वधूचे सौंदर्य वाढवण्याचे काम करते. मेहंदी हे प्रेमाचे लक्षण मानले जाते, त्याच्या रंगाबद्दल असे म्हटले जाते की मेहंदीचा रंग जितका उजळ असेल, वधूचा जीवन साथीदार तितकेच तिच्यावर प्रेम करेल. मेहंदीचा चमकदार रंग वधू आणि वरांसाठी खूप भाग्यवान आहे.

मेहंदी लावण्यामागे शास्त्रीय कारण

असे मानले जाते की लग्नाच्या वेळी वधू आणि वर या दोघांवरही खुप दडपण असते. मेहंदीची प्रकृती थंड असल्यामुळे ती शरीराचे तापमान राखून शरीराला थंडावा देते. म्हणूनच वधू-वरांना मेहंदी लावली जाते. इतकेच नाही तर मेहंदीचा उपयोग प्राचीन काळी आयुर्वेदिक औषध म्हणूनही केला जात होता.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!
बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....