Vat Pournima 2022: वटपौर्णिमेच्या दिवशी का केली जाते वडाच्या झाडाची पूजा? काय आहे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व

सात जन्मासाठी तोच नवरा मिळतो. म्हणून यादिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. तुम्ही कधी हा विचार केला आहे का वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा का केली जाते. जाणून घेऊया यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व काय आहे.

Vat Pournima 2022: वटपौर्णिमेच्या दिवशी का केली जाते वडाच्या झाडाची पूजा? काय आहे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 11:48 AM

Vat Pournima 2022: वटपौर्णिमेचे (Vat Pournima) व्रत सात जन्म तोच नवरा मिळण्यासाठी महिला करतात. हे व्रत केल्याने आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभते. पुढच्या सात जन्मासाठी तोच नवरा (Husband) मिळतो. यादिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. तुम्ही कधी हा विचार केला आहे का वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा का केली जाते. जाणून घेऊया यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व काय आहे.

हिंदू धर्मात असे अनेक व्रत आहेत जे सौभाग्यवती स्त्रिया नवऱ्याच्या दीर्घआयुष्यांसाठी करतात. त्यापैकीच एक व्रत हे वटसावित्रीचे आहे. हे व्रत दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येच्या तिथीला केले जाते. यावर्षी वट सावित्रीचे व्रत (Vat Savatri 2022) 14 जून मंगळवारी ठेवता येईल. यादिवशी सौभाग्यवती स्त्रिया विधीवत विष्णु देवाची, लक्ष्मी आणि वडाच्या झाडाची पुजा करतात. वटपौर्णिमेचे व्रत केल्याने सुख-समृद्धी आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. सर्व दु:ख नाहीशी होतात. हिंदू धर्मात अनेक धर्मात वडाच्या झाडाची पूजा केली जाते. पण, वटपौर्णिमेच्या दिवशी यापुजेला विशेष महत्व असते. पण, वडाचेच झाड का असा तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागची धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व काय आहे जाणून घेऊया.

वटवृक्षाच्या पूजे मागचे धार्मिक महत्व

वटवृक्षाच्या खोडात विष्णु, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान आहेत. वडाच्या झाडाच्या बऱ्याच फाद्यांना पारंब्या असतात यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असं मानलं जातं. मनातील इच्छा पूर्ण होतात. संतान प्राप्ती साठी देखील अनेक स्त्रियां वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाचे आयुष्य हे लांब असते. ज्येष्ठ महिन्यातील अमावस तिथीला वट वृक्षाच्या (Banyan Tree) सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुर्नजीवन मिळवून दिले होते. यादिवसापासून वट वृक्षाची पूजा केली जाऊ लागली. पिंपळाच्या झाडाला विष्णु देवाचे प्रतीक मानले जाते. तसंच वटवृक्षाला शिव शंकराचं प्रतीक मानलं जातं. यावृक्षाची पूजा करणं शंकराची पूजा करण्यासारखं आहे.

हे सुद्धा वाचा

वटवृक्षाचे वैज्ञानिक महत्व

वडाचे झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन देते. हे झाड दिवसात 20 तासांपेक्षा जास्त वेळ ऑक्सीजन देण्याचे काम करते. याझाडाच्या फांद्यात कार्बन डायऑक्साइड घेण्याची क्षमता असते. हे वातावरण शुद्ध ठेवायचे काम करते. वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखलं जातं. वडाच्या झाडाची मुळं, पानं, फुलं आणि चीक तसंच साल या सगळ्याचा उपयोग औषध म्हणून करण्यात येतो. इतकंच नाही तर त्याचा केशवर्धक म्हणूनही वापर करतात. तसंच याच्या पारंब्या शिकेकाईमध्ये घालून पाणी उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास, केसांच्या वाढीसाठी उपयोग होतो. त्यामुळे वडाच्या झाडांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. शरीराला आवश्यक असा ऑक्सिजन तुम्हाला वडाच्या झाडामुळे मिळतो. वडाच्या काटक्यांचा उपयोग हा होमहवनामध्ये आणि यज्ञामध्ये समीधा म्हणून करण्यात येतो. तसंच वडाच्या प्रत्येक फांदी, पारंबी आणि पानामधूनही नवीन वटवृक्ष जन्माला येतो. त्यामुळे या वृक्षाला अक्षयवट असं म्हणतात. त्यामुळेच वटपौर्णिमेला वडाचं पूजन केलं जातं.

(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे. याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही.)

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.