AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवांची करा अशी पूजा, जीवनातील सर्व संकट होईल दूर

हिंदू धर्मात कालाष्टमीचा दिवस महादेवांचे रूप असलेल्या कालभैरवाच्या पूजेला समर्पित आहे. या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते, शत्रूंचा नाश होतो आणि जीवनात यश प्राप्त होते.

कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवांची करा अशी पूजा, जीवनातील सर्व संकट होईल दूर
| Edited By: | Updated on: Jan 19, 2025 | 3:32 PM
Share

हिंदू धर्मात कालाष्टमीचा दिवस भगवान कालभैरवाची पूजा करण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो. कालभैरवाची उपासना केल्याने वाईट शक्तींचा नाश होतो असे मानले जाते. कालभैरव ही रक्षणाची देवता मानले जाते. त्याची पूजा केल्याने माणसाला संरक्षण मिळते कालभैरवच्या कृपेने माणसाला जीवनात यश मिळते.

पंचांगानुसार माघ महिन्याची कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 21 जानेवारी रोजी दुपारी 12: 39 मिनिटांनी सुरू होईल आणि 22 जानेवारी रोजी दुपारी 3: 18 मिनिटांनी संपन्न होईल. त्यामुळे माघ महिन्याची कालाष्टमी 21 जानेवारीला केली जाणार आहे कारण कालाष्टमी ची पूजा संध्याकाळी केली जाते.

कालाष्टमीच्या दिवशी अशी करा पूजा

१. कालाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. २. पूजेचे ठिकाण स्वच्छ करून फुलांनी आणि दिव्यांनी ते ठिकाण सजवा. ३. कालभैरवची मूर्ती किंवा फोटो तिथे ठेवा. ४. कालभैरवाला गंगेच्या पाण्याने स्नान करून कालभैरवाला फुले, चंदन, कुंकू इत्यादी अर्पण करा. ५. कालभैरवच्या विविध मंत्रांचा जप करा आणि त्यांची स्तुती करा. ६. कालभैरवाला नैवेद्य दाखवा. तुम्ही नैवेद्य म्हणून फळे, मिठाई किंवा इतर नैवेद्यही ठेवू शकता. ७. शेवटी कालभैरवाची आरती करा. ८. काळया कुत्र्याला भाकरी खायला द्या कारण काळया कुत्र्याला कालभैरवाचे वाहन मानल्या जाते. ९. मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावा.

काल भैरव मंत्र

ॐ क्लीं कालिकायै नमः

कालाष्टमीच्या दिवशी हे करा

कालाष्टमीच्या दिवशी तुम्ही उपवास करू शकता.

या दिवशी कालभैरवच्या मंत्राचा जप करा.

विशेषतः काळे तीळ आणि काळे हरभरे या दिवशी दान करा.

कालाष्टमीच्या दिवशी हे करू नका

कालाष्टमीच्या दिवशी नकारात्मक विचारांपासून दूर राहा.

खोटे बोलणे टाळा आणि रागावणे टाळा. तसेच मांसाहार देखील करू नका.

कांदा, लसूण याचे सेवन करू नका.

कालाष्टमीचे महत्व

कालाष्टमीचा दिवस हा कालभैरवाचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा एक विशेष दिवस मानला जातो. या दिवशी पूजा केल्याने व्यक्तीला अनेक फायदे होतात आणि जीवनात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही. तसेच सर्व संकटे दूर होतात. कालाष्टमीच्या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने जीवनात मंगल आणि सुख समृद्धी येते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.