AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK Asia Cup 2025 : मैदानात हॅरिस रौफसोबत जोरदार भांडण, अभिषेक शर्मा मॅच संपल्यानंतर बोलला की, विनाकारण त्यांनी…VIDEO

Abhishek Sharma vs Haris Rauf Fight : भारत-पाकिस्तान सामन्यात खेळाडूंमध्ये तणाव सामान्य बाब आहे. आशिया कप 2025 मध्ये सुपर 4 च्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि हॅरिस रौफ यांच्यात सुद्धा काल असाच वाद झाला. मॅच संपल्यानंतर अभिषेक शर्माने नेमकं काय घडलं? त्यावर बोलला.

IND vs PAK Asia Cup 2025 : मैदानात हॅरिस रौफसोबत जोरदार भांडण, अभिषेक शर्मा मॅच संपल्यानंतर बोलला की, विनाकारण त्यांनी...VIDEO
Abhishek Sharma vs Haris Rauf Fight
| Updated on: Sep 22, 2025 | 8:35 AM
Share

भारत-पाकिस्तान सामना आणि मैदानावर तणाव नाही, असं कसं होईल? 21 सप्टेंबरच्या संध्याकाळी दुबईत असच काही पहायला मिळालं. सुपर-4 च्या संग्रामात भारतीय इनिंगच्या पाचव्या ओव्हरमध्ये मोठा वाद झाला. अभिषेक शर्मा आणि हॅरिस रौफमध्ये वादावादी झाली. प्रकरण इतकं वाढलं की, दोघांना थांबवण्यासाठी अंपायर गाजी सोहेल यांना हस्तक्षेप करावा लागला. हॅरिस रौफला फक्त एकटा अभिषेक भिडला नाही,तर या वादात त्याला शुभमन गिलचा पूर्ण सपोर्ट मिळाला. अभिषेक आणि हॅरिसने आधीच परस्परांवर शब्दांचे बाण चालवायला सुरुवात केली होती. शुबमन गिलने शेवटच्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर या वादात उडी घेतली. त्यानंतर हा वाद आणखी भडकला. तो रौफला काहीतरी बोलताना दिसला. हॅरिस रौफच्या आधी अभिषेक शर्मा आफ्रिदीला भिडला.

शाहीन शाह आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माने सिक्स मारल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती. पण हॅरिससोबत झालेल्या अभिषेक शर्माच्या वादाने भारत-पाकिस्तान सामन्यातील वातावरण आणखी तापलं. पाकिस्तानी गोलंदाजांविरोधात अभिषेक शर्माच फक्त तोंड चाललं नाही, तर बॅटही चालली.

अभिषेक शर्मा काय म्हणाला?

मॅच संपल्यानंतर आक्रमक ओपनर अभिषेक शर्मा म्हणाला की, “मला वाटतं की, विनाकारण ते आमच्यावर वर्चस्व गाजवत होते. ते मला आवडलं नाही. म्हणून मी विचार केला की, बॅटनेच उत्तर देणं चांगलं आहे. मी तेचं केलं. अखेरीस टीमचा विजय या गोष्टीच प्रमाण आहे की, मी जे ठरवलं, जे मला हवं होतं, ते करण्यात मी यशस्वी ठरलो”

189.74 च्या स्ट्राइक रेटने ठोकल्या धावा

अभिषेक शर्माने पाकिस्तान विरुद्ध सुपर-4 च्या सामन्यात फक्त 39 चेंडूत 74 धावा चोपल्या. 189.74 च्या स्ट्राइक रेटने खेळलेल्या या इनिंगमध्ये अभिषेकच्या बॅटमधून 6 चौकार आणि 5 षटकार निघाले.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच