AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजयाचे अश्रू गोड, मॅच जिंकल्यानंतर अजिंक्यची पहिली प्रतिक्रिया

"आजच्या आनंदाच्या अश्रूंची चव एकदमच गोड होती. फार भारी वाटलं. मला कळत नव्हतं, मी स्वत:ला कसं कंट्रोल करावं", अशी प्रतिक्रिया कर्णधार अजिंक्य रहाणे याने दिली Ajinkya Rahane first reaction on team India win series in Australia

विजयाचे अश्रू गोड, मॅच जिंकल्यानंतर अजिंक्यची पहिली प्रतिक्रिया
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 19, 2021 | 8:32 PM
Share

मुंबई : “आजच्या आनंदाच्या अश्रूंची चव एकदमच गोड होती. फार भारी वाटलं. मला कळत नव्हतं, मी स्वत:ला कसं कंट्रोल करावं. याशिवाय अजूनही काय झालंय हे मला अद्यापही कळत नाहीय. मला वाटतं त्यासाठी थोडा वेळ लागेल. सगळ्यांनीच खूप चांगलं काम केलं. विशेषत: या सामन्यात नव्या खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली”, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचा हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणे याने दिली. ज्येष्ठ पत्रकार सुंनदन लेले यांनी ट्विटरवर रहणे आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मुलाखतीचा एक छोटासा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अजिंक्य रहाणे आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे (Ajinkya Rahane first reaction on team India win series in Australia).

भारतीय क्रिकेट संघाने आज ऐतिहासिक कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यात 3 विकेट्सने विजय मिळवत टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर मालिकाही जिंकली आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने हा विजय मिळवला. या विजयानंतर पत्रकार सुंनदन लेले यांनी त्यांच्यासोबत ऑनलाईन बातचित केली. यावेळी अजिंक्यने खुल्या मनाने प्रतिक्रिया दिली.

“या सामन्यातून वॉशिंग्टन आणि नटराज यांचा टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू झाला. शार्दूलची दुसरी मॅच होती. सिराज आणि सैनीची दुसरी-तिसरी मॅच होती. ज्याप्रकारे त्यांनी करुन दाखवलं, मी त्यांच्यासाठी खूप खूश आहे”, असं अजिंक्य रहाणे म्हणाला (Ajinkya Rahane first reaction on team India win series in Australia).

“आपल्या देशासाठी आपल्याला मॅच जिंकवायची आहे, त्यासाठी 50 ते 60 टेस्ट मॅचचा अनुभव असणं जरुरीचं नाही. मैदानावर तुमची जिद्द असेल तर तुम्ही काहीही करु शकता. पुजारा अप्रतिम खेळला. त्याला अंगाला बाऊन्सर लागले, पण त्याचा त्याला काही फरक पडला नाही. तो खचला नाही. मला विकेट वाचावायची आहे, हे एकच त्याचं ध्येय होतं. त्याच्या अशाप्रकारच्या खेळीमुळे ऋषभ पंतसाठी खेळ सोप्पा झाला. तो स्वतंत्रपणे खेळू शकला. पुजारा बाद झाल्यानंतर वॉशिंग्टनने चांगली कामगिरी केली. त्यामुळे क्रेडीट सगळ्यांना जातं. विशेष म्हणजे पुजारा आणि ऋषभ पंत यांना जास्त जातं”, अशी प्रतिक्रिया अजिंक्यने दिली.

रवी शास्त्री यांनी यावेळी पुजाच्या खेळीवर प्रतिक्रिया दिली. “पुजारा आमच्या टीमचा बॅटल मॅन आहे. तो वॉरिअर आहे. त्याचं काम बघून मी त्याला सांगितलं, पुजी तुला मानलं”, असं रवी शास्त्री म्हणाले.

संबंधित बातम्या:

 इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा, इशांतचं पुनरागमन, शार्दुल-सुंदरला संधी

Aus vs Ind 4th Test, 5th Day Live | लढले, नडले, भिडले, कांगारुंची घमेंड उतरवली, टीम इंडियाचा थरारक विजय

Aus vs Ind 4th Test | फंलदाजी करताना हातावर चेंडूचा जोरदार फटका, पुजारा मैदानात कोसळला

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...