AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताविरोधात हरल्यानंतर पाकिस्तानी संघात उभी फूट, ड्रेसिंग रुममध्ये घमासान

भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारल्याने पाकिस्तानची खिल्ली उडवली जाते आहे. पाकिस्तानातील क्रिकेट चाहत्यांकडून तर पाकिस्तानी संघावर प्रचंड टीका केली जात आहे.

भारताविरोधात हरल्यानंतर पाकिस्तानी संघात उभी फूट, ड्रेसिंग रुममध्ये घमासान
| Edited By: | Updated on: Jun 18, 2019 | 4:52 PM
Share

मँचेस्टर (इंग्लंड) : वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. त्यानंतर पाकिस्तानी संघात मोठी धुसफूस सुरु झाली आहे. पाकिस्तानी क्रिकेट टीमचा कर्णधार सरफराज अहमद प्रचंड नाराज आहे. सरफराजने पाकिस्तानी टीममधील काही खेळाडूंवर आपला संताप व्यक्त करत, गटबाजीचा आरोपही केला.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना संपल्यानंतर सरफराज अहमद ड्रेसिंग रुममध्ये गेला आणि तिथे उपस्थित पाकिस्तानी खेळाडूंवर संतापला. वहाब रियाज, इमाम-उल-हक, बाबर आजम आणि इमाद वसीम यांच्यावर सरफराज अहमदने गटबाजीचा आरोप केला. सरफराज अहमदने वसीमला तर पाकिस्तानी संघातील गटबाजीचा ‘सरदार’ म्हटलं.

सरफराज म्हणाला, पाकिस्तानी संघाचा कर्णधार बनण्यावरच इमादचं लक्ष आहे. या आरोपानंतर ड्रेसिंग रुममध्येच पाकिस्तानी संघात घमासान उडालं.

पाकिस्तानी संघातील ऑलराऊंडर शोएब मलिक हा सुद्धा सरफराज आरोप करत असलेल्या गटाचं समर्थन करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. वर्ल्डकप संपल्यानंतर शोएब मलिक निवृत्त होणार आहे. त्यानेच तशी घोषणा केली आहे.

सरफराजचा राग पाहून प्रशिक्षकही शांत बसले!

भारताविरोधात खेळताना पाकिस्तानी संघाने अत्यंत वाईट कामगिरी केली. यावरुन सरफराजने संघातील खेळाडूंना प्रचंड सुनावलं. यावेळी पाकिस्तानी क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर अगदी शांत बसले होते. मात्र, थोड्या वेळाने मिकी आर्थर केवळ क्रिकेटशी संबंधित विषयांवर बोलले. खेळाडूंनी नीट कामगिरी केली असती, तर भारताविरोधात जिंकणं शक्य होतं, असे सरफराजचे मत होते.

भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारल्याने पाकिस्तानची खिल्ली उडवली जाते आहे. पाकिस्तानातील क्रिकेट चाहत्यांकडून तर पाकिस्तानी संघावर प्रचंड टीका केली जात आहे.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान आतापर्यंत पाच सामने खेळला असून, गुणतालिकेत पाकिस्तानकडे केवळ 3 गुण आहेत. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला पोहोचणं सुद्धा अशक्य होऊन बसलं आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली