अभिषेक शर्माच्या फॉर्मची इशान किशनने उडवली खिल्ली? गंभीर सुद्धा हसला! Video Viral

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील.सुपर 8 फेरीचा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात भारताचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी सराव शिबिरात चांगलाच घाम गाळला. तसेच सराव सत्राच्या शेवटी गोल रिंगण करून एकमेकांना प्रेरणा देताना दिसले.

अभिषेक शर्माच्या फॉर्मची इशान किशनने उडवली खिल्ली? गंभीर सुद्धा हसला! Video Viral
अभिषेक शर्माच्या खराब फॉर्मची इशान किशनने उडवली खिल्ली? गंभीर सुद्धा हसला! Video Viral
Image Credit source: video grab
| Updated on: Feb 21, 2026 | 7:11 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीपूर्वी टीम इंडियाने कसून सराव केला. भारताचा पहिला सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध आहे. या सामन्यात अभिषेक शर्माकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. कारण मागच्या तीन सामन्यात त्याची कामगिरी सुमार राहिली आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष असणार आहे. हा महत्त्वाचा टप्पा असून येथे चूक करणं महागात पडू शकते. असं असताना या सामन्यापूर्वी सराव सत्र संपलं आणि खेळाडूंनी गोल रिंगण करून एकमेकांना प्रेरणा देत हिम्मत वाढवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अभिषेक शर्माने गोल रिंगणात प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या. त्यावेळी त्याच्या बाजूला ओपनर पार्टनर इशान किशन उभा होता. इशान किशन त्याचं सर्व म्हणणं कान देऊन ऐकत होता. यावेळी तो हसू लपवत असल्याचं दिसून आलं. त्याने हसू आवरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण त्याच्या चेहऱ्यावर सर्व काही स्पष्ट दिसत होतं.

अभिषेक शर्मा व्हिडीओच्या सुरूवातीला चला आपण संघ सहकाऱ्यांना प्रेरणा देऊ या, असं म्हणत गोल रिंगण करतो. अभिषेक शर्माने यावेळी सांगितलं की, ‘ही एक विजेत्या संघाची निशाणी आहे. फक्त आता एकमेकांच्या कामगिरीचा आनंद लुटत आहोत. आपण सर्व काही चांगलं करत आहोत. आम्ही सर्व सामन्यात एनर्जी दाखवत आहोत. हे खूप छान आहे. आपण येथे सर्व सामने जिंकण्यासाठी आलो आहोत. चला तर मग याचा आनंद लुटू या.’ अभिषेक शर्माने असं म्हटल्यानंतर कॅमेरा पॅन झाला आणि त्यात प्रशिक्षक गौतम गंभीर चित्रित झाला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरही हसू होतं.

अभिषेक शर्मा हा टीम इंडियासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याची बॅट चालली तर एकटाच सामना संपवू शकतो याची जाणीव संघ व्यवस्थापनाला आहे. त्यामुळे त्याच्या शून्याची काळजी कोणालाच नाही. कारण टी20 क्रिकेटमध्ये आक्रमक बाणा कायम असणं गरजेचं आहे. पावरप्लेमध्ये 70-80 धावा आल्या तर प्रतिस्पर्धी संघ तिथेच अर्धा होतो. त्यामुळे अभिषेक शर्माकडून सुपर 8 ते अंतिम फेरीपर्यंत अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.