AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्यकुमार यादवकडून अभिषेक शर्माच्या उपकारांची परतफेड! सुपर 8 फेरीपूर्वी संघांना दिला इशारा

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा सुपर 8 फेरीचा थरार आता रंगणार आहे. या फेरीत टीम इंडियाच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. खासकडून सुपर फ्लॉप ठरलेल्या अभिषेक शर्माकडून अपेक्षा आहेत. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात काय करतो? याकडे लक्ष असेल.

सूर्यकुमार यादवकडून अभिषेक शर्माच्या उपकारांची परतफेड! सुपर 8 फेरीपूर्वी संघांना दिला इशारा
सूर्यकुमार यादवकडून अभिषेक शर्माच्या उपकारांची फेड! सुपर 8 फेरीपूर्वी संघांना दिला इशाराImage Credit source: PTI
| Updated on: Feb 21, 2026 | 6:10 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा मधला टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी लढती होणार आहे. सुपर 8 फेरीत भारताचा पहिला सामना टी20 वर्ल्डकप 2024 उपविजेत्या दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. या सामन्यातील विजयी संघाचा उपांत्य फेरीच्या दिशेने सामना सुकर होणार आहे. असं असताना अभिषेक शर्माच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे. कारण या स्पर्धेत त्याला खातंही खोलता आलेलं नाही. साखळी फेरीतील तिन्ही सामन्यात शून्यावर बाद झाला. वर्ल्ड नंबर 1 फलंदाजाची अशी स्थिती पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. त्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे. पण टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला याबाबत काहीच वाटत नाही. उलट प्रतिस्पर्धी संघांना अभिषेक शर्माची भीती घालत आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेला सामोरं गेला. तेव्हा त्याने सांगितलं की, ‘अभिषेक शर्माच्या फॉर्मची चिंता जे लोक करत आहेत. मला त्यांची चिंता वाटत आहे. मला त्या संघांची चिंता आहे जे अभिषेकचा सामना करणार आहेत. मागच्या वर्षात त्याने सर्व काही केलं. आता आमची पाळी असून त्याचे उपकार फेडायचे आहेत.’ टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अभिषेक शर्मा टीम इंडियाची ताकद मानली जात होती. पण साखळी फेरीतील त्याच्या कामगिरीने प्लेइंग 11 मध्ये ठेवायचं की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाला. त्यानंतर त्याची तब्येत बिघडली आणि रूग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळला आणि शून्यावर बाद झाला. नेदरलँडविरुद्धही तसंच झालं.

एका महिन्यात अभिषेक शर्मा 8 टी20 सामन्यापैकी 5 सामन्यात शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळे चिंता तर वाटणारच.. दुसरीकडे, संजू सॅमसनही फॉर्मात नाही. त्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. असं असलं तरी भारताने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले. आता सुपर 8 फेरीत खरी कसोटी आहे. कारण येथे तगड्या संघांचा सामना करावा लागणार आहे. उपांत्य फेरीसाठी भारताला किमान दोन सामने जास्त नेट रनरेटने जिंकावे लागणार आहेत.

सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका
सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका.
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण.
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची सुनील तटकरे यांनाही पूर्वकल्पना होती?.
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला
संजय राऊत आणि दादा भुसे यांच्यातील फौजदारी खटला संपला.
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका..
टिपू सुलतानच्या मुद्द्यावर ठाकरे गटाची भूमिका काय? संजय राऊतांनी एका...
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा..
रोहित पवारांचे VSR कंपनीवर गंभीर आरोप; SR कंपनीला एका बड्या नेत्याचा...
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक
बदलापूरमध्ये अंडाशय तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड; तीन महिलांना अटक.
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर
चंद्रपूरचा बदला भिवंडीत, काँग्रेसच्या पाठिंब्याने नारायण चौधरी महापौर.