AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: ‘मी संघातील सदस्यांना सांगिन की…’,पहिल्या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला….

वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये (INDvsWI) भारताने आज सहा विकेट राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजने दिलेले 177 धावांचे लक्ष्य भारताने आरामात पार केलं.

IND vs WI: 'मी संघातील सदस्यांना सांगिन की...',पहिल्या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला....
| Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 8:29 PM
Share

अहमदाबाद: वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये (INDvsWI) भारताने आज सहा विकेट राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजने दिलेले 177 धावांचे लक्ष्य भारताने आरामात पार केलं. नियमित कर्णधार म्हणून रोहित शर्माचा (Rohit sharma) हा पहिलाच सामना होता. त्याने विजयी सुरुवात केली आहे. रोहितने स्वत: कर्णधारपदाला साजेसा खेळ दाखवला. त्याने 60 धावांची अर्धशतकी खेळी केली. पण भारताच्या विजयाचे खरे नायक ठरले, युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर. (Washington sundar) या दोघांच्या फिरकीने वेस्ट इंडिजला गुंडाळून टाकलं. वेस्ट इंडिजचे आघाडीचे फलंदाज या दोघांनीच बाद केले. त्यामुळेच भारताचा पुढचा मार्ग सोपा झाला. रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेसा खेळ दाखवला. त्याने 51 चेंडूत 60 धावांची खेळी करताना दहा चौकार आणि एक षटकार लगावला.

सामन्यातनंतर प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये रोहित शर्माने कर्णधार म्हणून त्याचे विचार व्यक्त केले. “संघ म्हणून आम्हाला स्वत:हामध्ये सतत सुधारणा करायची आहे. प्रत्येकाने त्याच्या बाजूने चांगले प्रयत्न केले. आम्हाला काय मिळवायचय, त्या बद्दल आम्ही चर्चा केली आणि आम्ही ते सर्व केलं. होल्डर-एलेनने चांगली भागीदारी केली. आम्हाला ती जोडी फोडायची होती. काही बदल करायचे असतील, तर ते ही करु” असे रोहित म्हणाला.

“संघाल जे हवय ते मिळवणं, अंतिम लक्ष्य आहे. आम्हाला खूप काही बदल करायचा आहे, असं मला वाटत नाही. मी खेळाडूंना सांगीन की, तुम्ही तुम्हाला आव्हान द्या, कल्पक बना. मी दोन महिने मैदानापासून दूर होतो. पण आजचा सामना खेळायला उतरताना पूर्ण आत्मविश्वास होता. या सामन्यात नाणेफेकीच कौल महत्त्वाचा होता. तुम्ही जे ठरवलय ते करत राहिलात, तर तुम्ही कुठल्याही संघाला रोखू शकता. तुम्ही नाणेफेक जिंकली, तर काही गोष्टीचा फायदा मिळतो” असे रोहित म्हणाला.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली