AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हा तर इस्लामचा विजय’, पाकिस्तानच्या नेत्याने खेळाला दिला धर्माचा रंग

रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तान संघाने भारताचा 10 विकेट्सनी दारुण पराभव केला. क्रिकेटच्या मैदानात झालेल्या या सामन्यानंतर आता सोशल मीडियासह विविध प्लॅटफॉर्मवर विविध विधानांनी नवा खेळ सुरु झाला आहे.

'हा तर इस्लामचा विजय', पाकिस्तानच्या नेत्याने खेळाला दिला धर्माचा रंग
शेख राशीद
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 9:54 PM
Share

T20 World Cup 2021 : टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रंगला. पाकिस्तानने भारताला अगदी सहज पराभूत केलं. आधी पाकिस्तानी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज हताश झाले तर नंतर भारतीय गोलंदाजाना पाकच्या एकाही खेळाडूला बाद करता आलं नाही. त्यामुळे पाकने 10 विकेट्सनी विजय मिळवला. पण या सामन्यानंतर तेव्हापासून आतापर्यंत सोशल मीडियासह विविध ठिकाणी याच सामन्याची चर्चा आहे. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येकजण यावरच चर्चा करत असून जगभरातील क्रिकेटपटू आपआपली मतं व्यक्त करत आहेत. दरम्यान आनंदी असणाऱ्या पाकिस्तानच्या नागरिकांनी अजब वक्तव्य करायला सुरुवात केली आहे. यामध्ये पंतप्रधान इम्रान खान सरकारमधील शेख राशीद (sheikh rashid) या नेत्याने या सामन्याला धर्माचा रंग देण्याचा प्रकार केला आहे.

पाकिस्तानने तब्बल 14 वर्षानंतर विश्वचषक स्पर्धेत तर टी20 विश्वचषकात प्रथमचं भारताला पराभू केलं. या मोठ्या विजयानंतर पाकिस्तानमधील सर्वच जनता आनंदी असून अनेक विधानं आता समोर येत आहेत. पण यामध्ये पाकिस्तानचे गृहमंत्री असणारे शेख राशीद यांचं विधान सर्वात विचित्र आहे. त्यांनी या विजयाला इस्लांचा विजय असल्याचं वक्तव्य केलं आहे. यातून एका खेळाला धर्माचा रंग देत राशीद यांनी हे विधान केलं आहे.  

‘भारतीय मुसलमानांनाही पाकिस्तानचाच विजय हवा होता’

राशीद यांनी सामन्यानंतर पाकिस्तान संघाचं अभिनंदन केलं. पण याचवेळी विचित्र विधानं देण्यास सुरुवात केली. त्यांनी या विजयाला इस्लामचा विजय असल्याचं तर म्हटलंच. पण सोबतच भारतीय मुसलमानही पाकिस्तानचा विजय व्हावा असं चिंतत असल्याचंही म्हटलं. ते भारतासोबत नाही तर पाकिस्तानसोबत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

इम्रान खान यांनी राशीदना बोलावलं परत

राशीद  हे बहुतांश भारत-पाक सामने मैदानात पाहायला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाही ते युएईला गेले होते. पण त्यांना सामन्याआधी परत यावं लागलं. सूत्रांच्या माहितीनुसार सुरक्षासंबधी कामांमुळे प्रधानमंत्री इम्रान खान यांनीच त्यांना माघारी बोलावलं होतं.

इतर बातम्या

India vs Pakistan : पाकिस्तानी खेळाडू आणि विराटच्या मिठीची जगभर चर्चा, Video तुफान व्हायरल

India vs Pakistan : वरुण चक्रवर्तीसारखे बोलर तर पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्येपण मिळतील, माजी पाक कर्णधाराचा हल्लाबोल

India vs Pakistan : भारताच्या पराभवानंतर विनोद कांबळी वैतागला, हार्दीकला म्हणतो जाऊन दांडीया खेळ

(After India vs Pakistan match Pakistan minister sheikh rasheed says this is Victory of Islam)

गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय.
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?.
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.