AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 World Cup: सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी BCCI घेतला महत्त्वाचा निर्णय

आयर्लंड (Ireland) विरुद्धच्या सामन्याआधी भारताचे सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह ठरले होते. भारताने आपला 17 सदस्यीय संघ वेस्ट इंडिजला पाठवला आहे.

U19 World Cup: सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी BCCI घेतला महत्त्वाचा निर्णय
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 3:28 PM
Share

गयाना: वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत (U19 World Cup)भारतीय संघाचं दमदार प्रदर्शन सुरु आहे. पण दुसऱ्याबाजूला कोरोनाचही सावट आहे. आयर्लंड (Ireland) विरुद्धच्या सामन्याआधी भारताचे सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह ठरले होते. भारताने आपला 17 सदस्यीय संघ वेस्ट इंडिजला पाठवला आहे. त्यातल्या सहाजणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे फक्त अकराच खेळाडू उरले होते. आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ त्या उर्वरित 11 खेळाडूंनाच घेऊन मैदानावर उतरला होता. टीमकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. पुढच्या सामन्यांमध्ये अडचणी वाढू नयेत, यासाठी बीसीसीआयने (BCCI) स्पर्धेआधी रिजर्वमध्ये ठेवलेल्या पाच खेळाडूंना वेस्ट इंडिजला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघ अंडर 19 वर्ल्डकपच्या ग्रुप बी मध्ये आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारताने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताने आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात सहा खेळाडू कोरोनाग्रस्त असूनही आयर्लंडला 174 धावांनी नमवले होते. भारताला ग्रुप स्टेजवर तिसरा सामना युगांडा विरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यातही भारत आयर्लंड विरुद्ध खेळलेल्या 11 खेळाडूंना घेऊन उतरणार आहे.

BCCI पाच रिजर्व खेळाडूंना वेस्ट इंडिजला पाठवणार ग्रुप स्टेजनंतर नॉकआऊटचे सामने सुरु होतील. म्हणजे इथे पराभव झाल्यानंतर पुन्हा संधी मिळणार नाही. कोरोनामुळे भारतीय संघाच्या अडचणी आणखी वाढू नयेत, यासाठी बीसीसीआयने उध्यम सहारन, विकेटकिपर फलंदाज अभिषेक पोरेल, रिथीश रेड्डी, अंश गोसाई आणि पीएम सिंह राठोड यांना वेस्ट इंडिजला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

After six players corona positive bcci to send in 5 reserve players for u19 world cup

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली