AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Agarkar | Team India Chief Selector अजित आगरकर यांचा मार्ग सोपा नाही, समोर आहेत 5 मोठी चॅलेंज

Ajit Agarkar | BCCI च्या चीफ सिलेक्टर पदावर अजित आगरकर यांची वर्णी लागली आहे. आगरकर मूळचे मुंबईकर असून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. चीफ सिलेक्टर म्हणून अनेक आव्हान त्यांच्यासमोर असतील.

Ajit Agarkar | Team India Chief Selector अजित आगरकर यांचा मार्ग सोपा नाही, समोर आहेत 5 मोठी चॅलेंज
BCCI New chief selector Ajit agarkar
| Updated on: Jul 05, 2023 | 7:55 AM
Share

मुंबई : BCCI निवड समितीच अध्यक्षपद अखेर भरलं आहे. चेतन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर मागच्या काही महिन्यापासून हे पद रिक्त होते. काही दिवसांपासून बीसीसीआय निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी अजित आगरकर यांच्या नावाची चर्चा होती. अखेर त्यांचीच या पदावर वर्णी लागली आहे. अजित आगरकर भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य सिलेक्टर असतील. BCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीने 4 जुलै रोजी आगारकर यांच्या नावाची घोषणा केली.

आगरकर याआधी IPL मधील दिल्ली कॅपिटल्स टीमसाठी काम करत होते. ते असिस्टेंट कोचच्या भूमिकेत होते. आता ते टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर आहेत. या रोलमध्ये त्यांच्यावर जबाबदाऱ्या, आव्हान वेगळी असतील. सध्या आगारकर यांच्यासमोर 5 मुख्य आव्हान कुठली आहेत? त्या बद्दल जाणून घेऊया.

या प्रश्नाच उत्तर अजित आगरकर यांना शोधायचय

टीम इंडियाचा पुढचा कॅप्टन कोण असेल? हा टीम इंडियाच्या चीफ सिलेक्टरसमोर मुख्य प्रश्न असेल. रोहित शर्माच वय वाढत चाललय. त्याचा परिणाम त्याचा फिटनेस आणि फॉर्मवर दिसतोय. सध्या रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन आहे. वर्ल्ड कपपर्यंत तो कर्णधारपदावर कायम राहील. रोहित शर्माच्या जागी कोण? या प्रश्नाच उत्तर अजित आगरकर यांना शोधाव लागेल.

वर्कलोड मॅनेजमेंट कसं करणार?

एक चांगली टीम बांधण्यासाठी आवश्यक आहे, खेळाडूंचे वर्कलोड मॅनेजमेंट. टीम इंडियाला पुढच्या काही महिन्यात अनेक मोठ्या सीरीज आणि टुर्नामेंट खेळायच्या आहेत. वर्कलोड मॅनेजमेंट कसं करणार? हे नव्या चीफ सिलेक्टरसमोर आव्हान आहे. वर्कलोड मॅनेज केल्यास एक चांगली आणि मजबूत टीमची बांधणी करता येईल. यावर्षी वनडे वर्ल्ड कप आहे तर पुढच्यावर्षी T20 वर्ल्ड कप आहे. यासाठी मजबूत टीमची निवड आणि ती निवडण्याच आव्हान अजित आगरकर यांच्यासमोर आहे. अजित आगरकर यांच्यासमोर सध्या कुठलं चॅलेंज?

टीम इंडियातील अनेक खेळाडू करिअरच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे आता लगेच नाही, पण वनडे वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाच बदल सुरु होतील. म्हणजे सिनियर खेळाडूंना बाजूला करुन त्यांच्याजागी युवा खेळाडूंची निवड केली जाईल. भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी हे सर्व बदल होतील. हे काम तडकाफडकी होणार नाही. याची एक प्रक्रिया असेल. त्याची रणनिती अजित आगरकर यांना ठरवावी लागेल. अजित आगरकर यांच्यासमोर आता आशिया कप आणि वनडे वर्ल्ड कपसाठी टीम निवडण्याच चॅलेंज आहे.

Follow Us
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.