AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: इंडिया-पाकिस्तान यांच्यात फायनलमध्ये सरस कोण? दोघांपैकी हा संघ वरचढ, पाहा आतापर्यंतची आकडेवारी

India vs Pakistan Final Record Stats : आशिया कप गतविजेत्या टीम इंडियासमोर यंदा अंतिम फेरीत पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान महाअंतिम सामन्याचे क्रिकेट चाहत्यांना वेध लागले आहेत. जाणून घ्या या दोन्ही संघांची अंतिम फेरीत एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी राहिली आहे.

IND vs PAK: इंडिया-पाकिस्तान यांच्यात फायनलमध्ये सरस कोण? दोघांपैकी हा संघ वरचढ, पाहा आतापर्यंतची आकडेवारी
Suryakumar Yadav and Salman Agha IND vs PAKImage Credit source: Getty Images
| Updated on: Sep 26, 2025 | 6:36 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानने सुपर 4 फेरीत दुसरा विजय मिळवला. पाकिस्तानने या विजयासह अंतिम फेरीत धडक दिली. यासह अंतिम फेरीतील 2 संघ निश्चित झाले. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी 28 सप्टेंबरला महामुकाबला होणार आहे. दोन्ही संघांची आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात फायनलमध्ये आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. टीम इंडियाने याआधी पाकिस्तानला साखळी आणि सुपर 4 फेरीत पराभूत केलं होतं. त्यानंतर आता टीम इंडियाकडे अंतिम फेरीत पाकिस्तानला तिसऱ्यांदा पराभूत करत सलग दुसऱ्यांदा आशिया कप ट्रॉफी उंचावण्याची संधी आहे. तर पाकिस्तानकडे याआधीच्या 2 पराभवांची परतफेड करण्याची संधी आहे. त्यामुळे महाअंतिम सामन्यात या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघात जोरदार चुरस असणार आहे.

भारत पाकिस्तान हे दोन्ही संघ 8 वर्षांआधी 2017 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात भिडले होते. तेव्हा पाकिस्तानने भारतावर मात करत आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर दोन्ही संघात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने आतापर्यंत दोन्ही संघ अंतिम फेरीत केव्हा केव्हा आमनेसामने आले आहेत? हे जाणून घेऊयात.

भारत-पाकिस्तान आणि अंतिम सामना

भारत-पाकिस्तान दोन्ही संघ पहिल्यांदा 1985 साली मोठ्या स्पर्धेतील अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानवर 8 विकेट्सने मात केली होती. त्या स्पर्धेपासून दोन्ही संघ अंतिम फेरीत एकूण 12 वेळा आमनेसामने आले आहेत. या अंतिम फेरीतील 12 सामन्यांमध्ये पाकिस्तान सरस ठरली आहे. पाकिस्तानवर 12 पैकी 8 वेळा अंतिम फेरीत विजय मिळवत मैदान मारलं आहे. तर टीम इंडियाने 4 वेळा पलटवार केला आहे.

पाकिस्तानने अखेरीस अंतिम फेरीत टीम इंडिया विरुद्ध 2017 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला होता. पाकिस्तानने टीम इंडियावर 180 धावांच्या फरकाने मात करत चॅम्पियन्स होण्याचा बहुमान मिळवला होता. तसेच टीम इंडियाने 2007 साली पहिल्याच टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात 5 धावांनी थरारक विजय साकारला होता.

आशिया कप स्पर्धेच्या इतिहासातील दोन्ही संघांची कामगिरी

दरम्यान आशिया कप स्पर्धेच्या 41 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. आशिया कप स्पर्धेची ही 17 वी वेळ आहे. भारत आशिया कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ भारताने 17 पैकी 8 वेळा आशिया कप ट्रॉफी जिंकली आहे. तर पाकिस्तानला केवळ 2 वेळाच आशिया चॅम्पियन्स होता आलं आहे. त्यामुळे आता या दोघांपैकी कोणता संघ आशिया चॅम्पियन होणार? यासाठी 28 सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं.

इंग्लंड दौऱ्यात छोट्या भावाकडून पराभव, झिम्बाब्वेत मोठ्या भावाची भीती! श्रेयसचं टेन्शन वाढलं

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी