IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया फायनल, कोण जिंकणार अंतिम सामना?

India vs Australia 3rd and Final T20i Preview : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया वूमन्स यांच्यात 21 फेब्रुवारीला टी 20i मालिका जिंकण्यासाठी रस्सीखेच असणार आहे.

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया फायनल, कोण जिंकणार अंतिम सामना?
AUS vs IND Harmanpreet Kaur and Sophie Molineux
Image Credit source: @BCCIWomen X Account
| Updated on: Feb 21, 2026 | 3:28 AM

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा आणि अंतिम टी 20i सामना शनिवारी 21 फेब्रुवारील होणार आहे. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना सामन्यास मालिका जिंकण्याची समसमान संधी आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात कांगारुंना पराभूत करत ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात विजयाने केली.भारताने पहिला सामना हा डीएलएसनुसार जिंकला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. मात्र ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या आणि करो या मरो अशा सामन्यात भारतावर मात केली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत 1-1 ने बरोबरी साधत आव्हानही कायम राखलं. अशात आता तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात दोघांपैकी कोणता संघ विजयी होणार? याची उत्सूता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे.

महिला ब्रिगेडला ऐतिहासिक कामगिरीची संधी

वूमन्स टीम इंडियाला तिसऱ्या सामन्यानिमित्ताने ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी आहे. वूमन्स टीम इंडियाला आतापर्यंत ऑस्ट्रेलियात कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i पैकी कोणतीही मालिका जिंकता आलेली नाही. मात्र आता ही संधी आहे. त्यामुळे महिला ब्रिगेड कांगारुंविरुद्ध ऑस्ट्रेलियात पहिलीवहिली आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्यात यशस्वी ठरणार का? याची प्रतिक्षा चाहत्यांना लागून आहे.