AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : कांगारुंना ब्रिस्बेनमध्ये पराभूत करणं आव्हानात्मक, टीम इंडिया गाबात माज उतरवणार? असे आहेत आकडे

AUS vs IND T20i Series : ऑस्ट्रेलियाची गाबातील कामगिरी ही उल्लेखनीय आहे. त्यामुळे टीम इंडियाचा 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर असूनही फायनलमध्ये कस लागणार आहे. जाणून घ्या.

IND vs AUS : कांगारुंना ब्रिस्बेनमध्ये पराभूत करणं आव्हानात्मक, टीम इंडिया गाबात माज उतरवणार? असे आहेत आकडे
Suryakumar Yadav Team India T20i CaptainImage Credit source: Bcci
| Updated on: Nov 07, 2025 | 8:49 PM
Share

सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने गुरुवारी 6 नोव्हेंबरला चौथ्या आणि निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर 48 धावांनी मात केली. भारताने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली. भारताने यासह ऑस्ट्रेलियात टी 20i सीरिज न गमावण्याची मालिका कायम ठेवली. आता भारतीय संघाला पाचव्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. मात्र भारतासाठी कांगारुंना ब्रिस्बेनमधील ‘द गाबा’त पराभूत करणं सहजासहजी शक्य होणार नाही. ऑस्ट्रेलियाचे या मैदानातील आकडे दमदार आहेत. ऑस्ट्रेलियाने या मैदानात फक्त 1 टी 20i सामना गमावला आहे. तर भारताने या मैदानात एकमेव टी 20i सामना खेळला आहे. त्यामुळे हा सामना भारतासाठी आव्हानात्मक असणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पाचवा सामना हा शनिवारी 8 नोव्हेंबरला होणार आहे. भारतीय संघ या मालिकेत आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला या सामन्यासह मालिका जिंकण्याची दुहेरी संधी आहे. तर यजमानांसमोर सामना जिंकून मालिका बरोबरीत करण्याचं दुहेरी आव्हान आहे. त्यामुळे कांगारुंसमोर भारताला रोखण्याचं आव्हान आहे. मात्र कांगारुंची या मैदानातील कामगिरी त्यांच्यासाठी दिलासादायक आहे.

ऑस्ट्रेलियाचे ब्रिस्बेनमधील आकडे

ऑस्ट्रेलियाने या मैदानात आतापर्यंत टी 20i क्रिकेटच्या इतिहासात एकूण 8 सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने या 8 पैकी 1 सामन्याचा अपवाद वगळता 7 वेळा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया या मैदानात गेल्या 12 वर्षांपासून अजिंक्य आहे. ऑस्ट्रेलियाने या मैदानातील पहिला आणि एकमेव सामना हा 2013 साली गमावला होता. तेव्हापासून ऑस्ट्रेलियाची या मैदानातील विजयी घोडदौड सुरुच आहे. त्यामुळे भारताला ही मालिका जिंकायची असेल तर कांगारुंची विजयी घोडदौड थांबवावी लागेल.

भारताचे आकडे

ऑस्ट्रेलियाने या मैदानात 8 सामने खेळलेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे या मैदानात टीम इंडियाच्या तुलनेत खेळण्याचा अनुभव आहे. तसेच खेळपट्टीची माहिती आहे. सोबतच ते यजमानही आहेत. तर दुसर्‍या बाजूला तर टीम इंडियाने या मैदानात एकमेव टी 20i सामना खेळला आहे.

भारताला या मैदानात खेळलेल्या एकमेव सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 2018 साली या मैदानात टी 20i सामना खेळवण्यात आला होता. भारताचा या सामन्यात डीएलएसनुसार 4 धावांनी पराभव झाला होता. त्यामुळे आता टीम इंडिया गेल्या पराभवाची परतफेड करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.