AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशने अफगाणिस्तानचा 8 धावांनी केला पराभव, सुपर 4 फेरीसाठी चुरशीची लढाई

आशिया कप २०२५ स्पर्धेच्या नवव्या सामन्यात बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना बांगलादेशसाठी करो या मरोची लढाई होती. पण बांगलादेशने बाजी मारत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे.

बांगलादेशने अफगाणिस्तानचा 8 धावांनी केला पराभव, सुपर 4 फेरीसाठी चुरशीची लढाई
बांगलादेशने अफगाणिस्तानचा 8 धावांनी केला पराभव, सुपर 4 फेरीसाठी ती संघात चुरशीची लढाई Image Credit source: ACC Twitter
| Updated on: Sep 17, 2025 | 12:34 AM
Share

आशिया कप २०२५ स्पर्धेचा बांग्लादेश अफगाणिस्तान यांच्यात चुरशीचा सामना झाला. हा सामन्यातील विजय काहीही करून बांगलादेशसाठी महत्त्वाचा होता. अपेक्षेप्रमाणे बांगलादेशने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानचा ८ धावांनी धुव्वा उडवला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ गडी गमवून १५४ धावा केल्या आणि १५५ धावांचं आव्हान दिलं. तन्झिद हसनने या सामन्यात ५२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात काही चांगली झाली नाही. पहिल्याच चेंडूवर सेदिकुल्लाह अटल बाद झाला. त्यानंतर इब्राहिम झाद्रानही काही खास करू शकला नाही. त्याने ५ धावा केला आणि बाद झाला. रहमनतुल्लाह गुरबाजने ३५ आणि अझमतुल्लाह ओमरजाई याने ३० धावा केल्या. या व्यतिरिक्त कोणी काही खास करू शकलं नाही.

अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खान म्हणाला की, आम्ही शेवटपर्यंत खेळात होतो पण खेळ संपवू शकलो नाही. १८ चेंडूत ३० धावा करणे खूप सोपे होते. आम्ही ज्या प्रकारचे क्रिकेट खेळण्यासाठी प्रसिद्ध आहोत. तसं खेळलो नाही. आम्ही स्वतःवर खूप दबाव निर्माण होऊ दिला. आम्ही ज्या पद्धतीने चेंडू घेऊन परतलो आणि त्यांना १६० च्या आत रोखले ते खास होते.परंतु फलंदाजीसह आम्ही काही बेजबाबदार फटके खेळले. टी२० मध्ये कधीकधी विरोधी संघ पहिल्या सहा षटकांतच खेळ हिरावून घेतो.पण नंतर तुम्हाला परत यावे लागते. या सामन्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. आशिया कपमध्ये प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. आम्हाला श्रीलंकेसाठी चांगली तयारी करावी लागेल, ते आमच्यासाठी एक मोठे आव्हान असेल.’

बांगलादेशचा कर्णधार लिटन दास म्हणाला की, सामना जिंकणे हा एक दिलासादायक अनुभव होता. पण शेवटच्या ४-५ षटकांत आम्ही फारशी चांगली फलंदाजी केली नाही. मला वाटले की पुरेशा धावा झाल्या होत्या पण तरीही आम्हाला वाटले की आम्ही १५-२० धावा कमी आहोत. नसुम आणि रिशादने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ती खास होती. आज तमिमने खूप चांगली फलंदाजी केली, सलामीची भागीदारी महत्त्वाची होती.

श्रीलंकेने अफगाणिस्तानला हरवले तर श्रीलंका आणि बांग्लादेश सुपर ४ फेरीत पात्र ठरेल. अफगाणिस्तानने श्रीलंकेला हरवलं, तर श्रीलंका-बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे गुण बरोबरीत असतील. नेट रनरेटच्या आधारावर सुपर ४ फेरीचे दोन संघ ठरतील. श्रीलंकेचा नेट रनरेट बांगलादेशपेक्षा कमी व्हायचा असेल. तर त्यांना अफगाणिस्तानविरुद्ध सुमारे ७० धावांनी किंवा ५० चेंडू शिल्लक ठेवून पराभव पत्करावा लागेल.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): तनझिद हसन तमीम, लिटन दास (कर्णधार आणि विकेटकीपर), सैफ हसन, तौहिद हृदयॉय, जाकेर अली, नसुम अहमद, नुरुल हसन, शमीम हुसेन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद.

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): सेदीकुल्लाह अटल, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, करीम जनात, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, एएम गझनफर, फजलहक फारूकी.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.