
टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज विरुद्ध मायदेशात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडिया या मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान वनडे आणि टी 20I सीरिज खेळणार आहे. उभयसंघातील एकदिवसीय मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. तर टी 20I मालिकेत 5 सामन्यांचा थरार रंगणार आहे. बीसीसीआय निवड समितीने या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
बीसीसीआयने रोहित शर्मा याचा एकदिवसीय कर्णधारपदावरुन पत्ता कट केला आहे. तर शुबमन गिल याला नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच विराट कोहली याचंही एकदिवसीय संघात कमबॅक झालं आहे. टीम इंडियाने याआधी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फायलनमध्ये 9 मार्च रोजी न्यूझीलंडला पराभूत केलं होतं. भारताचा हा शेवटचा एकदिवसीय सामना होता. त्यानंतर आता 7 महिन्यांनी भारतीय संघ एकदिवसीय सामने खेळणार आहे. चाहत्यांना रोहित-विराटच्या कमबॅकची प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा अवघ्या काही दिवसांनी संपणार आहे.
निवड समितीने टीम भारताच्या कर्णधारासह उपकर्णधारही बदलला आहे. शुबमनला उपकर्णधारपदावरुन कर्णधार करण्यात आलं. त्यामुळे आता शुबमननंतर श्रेयस अय्यर टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. श्रेयस एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार होता. रोहितनंतर श्रेयसला कॅप्टन करण्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र ही फक्त चर्चात ठरलीय.
तसेच एकदिवसीय संघात नव्या दमाच्या खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूंमध्ये नितीश कुमार रेड्डी आणि ध्रुव जुरेल यांचा समावेश करण्यात आला आहे. या दोघांचं अद्याप एकदिवसीय पदार्पण झालेलं नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून पदार्पणाची संधी मिळणार का? याची प्रतिक्षा या दोघांना असणार आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया
🚨 India’s squad for Tour of Australia announced
Shubman Gill named #TeamIndia Captain for ODIs
The #AUSvIND bilateral series comprises three ODIs and five T20Is against Australia in October-November pic.twitter.com/l3I2LA1dBJ
— BCCI (@BCCI) October 4, 2025
पहिला सामना, रविवार, 19 ऑक्टोबर, पर्थ
दुसरा सामना, मंगळवार, 23 ऑक्टोबर, एडलेड
तिसरा आणि अंतिम सामना, शनिवार, 25 ऑक्टोबर, सिडनी.
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया : शुबमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जैस्वाल.