AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCCI : शुबमन गिल कर्णधार होताच बीसीसीआयने तो निर्णय बदलला

India Cricket Team Bcci : बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाच्या 2 सामन्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

BCCI : शुबमन गिल कर्णधार होताच बीसीसीआयने तो निर्णय बदलला
Shubman Gill Team India CaptainImage Credit source: PTI
| Updated on: Jun 09, 2025 | 1:17 PM
Share

टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होण्यासाठी आता मोजून 11 दिवस बाकी आहेत. इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील टेस्ट सीरिजला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. उभयसंघातील पहिला सामना हा हेडिंग्ले लीड्स येथे खेळवण्यात येणार आहे. शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीीम इंडिया इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. त्याआधी बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने आगामी 2 सामन्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने 2 सामन्यांचे ठिकाण बदलले आहेत. बीसीसीआयने सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यानंतर बांगलादेश दौरा करणार आहे. टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यात 17 ते 31 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकी 3-3 सामन्यांची एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया मायदेशात परतणार आहे. टीम इंडिया मायदेशात वेस्टइंडिज विरुद्ध 2 ते 14 ऑक्टोबर दरम्यान 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना हा अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा सामना कोलकातामध्ये आयोजित करण्यात आला आहे. मात्र बीसीसीआयने आता या ठिकाणात बदल केला आहे.

बीसीसीआयने विंडीज विरूद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्याचं ठिकाण बदललं आहे. त्यानुसार दुसरा सामना हा आता इडन गार्डन्सऐवजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. बीसीसीआयने या व्यतिरिक्त विंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेच्या वेळापत्रकात कोणताही बदल केलेला नाही.

भारत-विंडीज कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 2 ते 6 ऑक्टोबर, अहमदाबाद

दुसरा सामना, 10 ते 14 ऑक्टोबर, कोलकाताऐवजी नवी दिल्ली

तसेच 14 ते 26 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात एकूण 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेतील सलामीचा सामना हा नवी दिल्लीत खेळवण्यात येणार होता. मात्र आता हा सामना ईडन गार्डन्समध्ये शिफ्ट करण्यात आला आहे.

बीसीसीआयकडून 2 सामन्यांचं ठिकाण बदललं

भारत-दक्षिण आफ्रिका टेस्ट सीरिज शेड्यूल

पहिला सामना, 14 ते 18 नोव्हेंबर, ईडन गार्डन्स

दुसरा सामना, 22 ते 26 नोव्हेंबर, गुवाहाटी

दरम्यान बीसीसीआयने 2 सामन्यांचं ठिकाण नक्की का बदललं आहे? हे समजू शकलेलं नाही. मात्र सामन्यांचं ठिकाण बदलले असल्याने चाहते नाराज झाले आहेत.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.