AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2025 स्पर्धेत सामन्यांची संख्या वाढणार का? बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

आयपीएल 2025 स्पर्धेबाबत आतापासूनच जोरदार तयारी सुरु झाली आहे. मेगा लिलावापूर्वी फ्रेंचायझींनी सपोर्ट स्टाफमध्ये भरणा सुरु केली आहे. दिग्गज खेळाडूंसह नवी रणनिती आखली जात आहे. असं असताना यंदाच्या आयपीएलमध्ये सामन्यांची संख्या वाढवली जाणार की नाही? असा प्रश्न समोर आला आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत सामन्यांची संख्या वाढणार का? बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय
IPL 2025 Auction
| Updated on: Sep 27, 2024 | 5:58 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धा सर्वार्थाने चर्चेत आली आहे. रिटेंशन आणि मेगा लिलावामुळे या स्पर्धेला आधीच रंगत चढली आहे. असं असताना आयपीएल 2025 स्पर्धेत सामन्यांची संख्या वाढणार की नाही? याबाबत खलबतं सुरु आहेत. आयपीएलने प्रत्येक पर्वासाठी सामन्यांची संख्या सूचीबद्ध केली होती. त्यानुसार टप्प्याटप्याने सामन्यांची संख्या 94 पर्यंत घेऊन जाण्याचा विचार आहे. यासाठी 2025 आणि 2026 या पर्वात सामन्यांची संख्या 74 वरून 84 करण्याचं ठरलं होतं. पण आता ही संख्या 74 राहील असं सांगण्यात येत आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, या पर्वात 74 सामने खेळले जातील. म्हणजेच 2022 या वर्षी ठरवलल्या सामन्यांपेक्षा 10 सामने कमी होतील. टेंडर दस्ताऐवजानुसार, आयपीएलमध्ये 2023-2024 स्पर्धेसाठी 74 सामने, 2025-2026 साठी 84 सामने आणि 2027 साठी 94 सामन्यांचा विचार केला गेला होता. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये असं काय घडलं की, फक्त 74 सामने खेळवले जातील. त्याबाबतचा उल्लेखही रिपोर्टमध्ये केला गेला आहे.

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, आयपीएलने 2025 या वर्षात 74 सामनेच खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचं कारण असं आहे की, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना त्यांचा कामाचा ताण हाताळण्यास मदत होईल. तसेच भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तसेच अंतिम फेरीसाठी फेव्हरेट मानला जात आहे. त्यामुळे बीसीसीआय भारतीय खेळाडूंना महत्त्वाच्या सामन्यांच्या तयारीसाठी पुरेशी विश्रांती देण्यासाठी हा विचार करत आहे. बीसीसीआयचे सचिन जय शाह यांनी मागच्या महिन्यात आयपीएल सामन्यांबाबत केलेलं वक्तव्यही महत्त्वाचं ठरणार आहे.

बीसीसीआयचे सध्याचे सचिव जय शाह यांनी इकॉनॉमिक टाईम्सला सांगितलं होतं की, ‘आम्ही आयपीएल 2025 मध्ये 84 सामने आयोजित करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, कारण सामन्यांची संख्या वाढल्यामुळे खेळाडूंवर वाढणारा ताण आम्हाला लक्षात ठेवावा लागेल.’ त्यामुळे 84 सामने हा कराराचा भाग असला तरी यंदा 74 सामने खेळवायचे की 84 हे ठरवण्याचा सर्वस्वी निर्णय हा बीसीसीआयकडे आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं होतं.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल