AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDvsAUS | तिसऱ्या कसोटीत अशी असेल टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन, हा खेळाडू खेळणारच!

टीम इंडियासाठी इंदूरमधील तिसरा कसोटी सामना हा बॉर्डर गावसकर ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या हिशोबाने अत्यंत महत्वाचा आहे.

INDvsAUS | तिसऱ्या कसोटीत अशी असेल टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन, हा खेळाडू खेळणारच!
| Updated on: Feb 27, 2023 | 10:53 PM
Share

इंदूर | बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना हा 1 मार्चपासून इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाचा तिसरा सामना जिंकून पुन्हा एकदा बॉर्डर गावसकर ट्रॉफीवर नाव कोरण्याचा प्रयत्न असणार आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी अतिशय महत्वाचा सामना आहे. त्यामुळे कॅप्टन रोहित या निर्णायक सामन्यात कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत उतरणार याबाबत अनेक दिग्गजांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या सामन्याआधी टीम इंडियाच्या एका खेळाडूने पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे यातून हे स्पष्ट झालंय की हा फ्लॉप ठरलेला खेळाडू तिसऱ्या कसोटीत खेळताना दिसणार आहे.

तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन केएस भरत याने पत्रकार परिषद घेतली. केएसने या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात विशेष कामगिरी केलेली नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटीतून केएसला टीममधून बाहेर बसवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र त्याने पत्रकार परिषद घेतल्याने संघातील जागा नक्की असल्याचं म्हटलं जात आहे.

केएस भरत काय म्हणाला?

“मी दिल्लीत माझ्या खेळाची मजा घेतली. तुम्हाला तुमच्या डिफेंसवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. या खेळपट्टीवर खेळणं अशक्य नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने खेळा. तुमच्या नैसर्गिक खेळावर विश्वास ठेवा नक्कीच त्यामुळे धावा करण्याची संधी आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने मला सांगितलं की दिल्ली कसोटीतील दुसऱ्या डावात मी सहाव्या क्रमांकावर बॅटिंग करेन. ऑस्ट्रेलिया ऑलआऊट होताच मी बॅटिंगसाठी सज्ज होतो. या खेळपट्टीवर शॉट सेलेक्शन योग्य असेल तर धावा होतात”, असं केएस भरत म्हणाला.

दरम्यान या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीनंतर उभयसंघात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. एकूण 3 सामन्यांची मालिका असणार आहे. या सीरिजला 17 मार्चपासून सुरुवात होणार आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.