AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup : आशिया कप वेळापत्रकात मोठी गडबड, टीम इंडियाला लाहोरमध्ये जावून खेळावंच लागणार

आशिया कप स्पर्धेच्या आयोजनाबाबत गेल्या काही दिवसांपासून खलबतं सुरु होती. दहशतवादी कारवाया पाहता भारताने पाकिस्तानात खेळण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानुसार वेळापत्रक जाहीर करण्यात आलं, पण झालं असं की..

Asia Cup : आशिया कप वेळापत्रकात मोठी गडबड, टीम इंडियाला लाहोरमध्ये जावून खेळावंच लागणार
Asia Cup : आशिया कप वेळापत्रकात मोठा घोळ, चुकून असं झालं तर लाहोरमध्ये खेळावा लागेल सामना
| Updated on: Jul 19, 2023 | 9:03 PM
Share

मुंबई : आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक अखेर जाहीर झालं आहे. आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम फेरीचा सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. यावेळी आशिया कप स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर खेळली जाणार आहे. म्हणजेच काही सामने पाकिस्तानात, तर काही सामने श्रीलंकेत होणार आहे. वेळापत्रक पाहिल्यानंतर पाकिस्तानला बीसीसीआयसमोर अखेर झुकावं लागलं असं चित्र आहे. वेळापत्रकात भारताचे सर्व सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात आले आहेत. पण वेळापत्रकातील एक चूक आता समोर आली आहे. यावरून आता जोरदार चर्चांना उधाण आलं आहे.

वेळापत्रकात काय आहे गडबड?

आशिया चषक वेळापत्रकानुसार पाकिस्तानात एकूण चार सामने होणार आहेत. आशिया कप 2023 स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना पाकिस्तानातील मुल्तानमध्ये होणार आहे. दुसरा सामना बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात लाहोरमध्ये खेळला जाणार आहे. तिसरा सामना अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात लाहोरमध्ये खेळला जाणार आहे. तर सुपर फोरमधील एक सामना पाकिस्तानातील लाहोरमध्ये खेळला जाणार आहे.

सुपर 4 मधील सामन्यावरून जोरदार घमासान आहे. कारण साखळी फेरीतील गणित चुकलं तर भारताला लाहोरमध्ये जाऊन सुपर 4 फेरीतील एक सामना खेळावा लागू शकतो. हा सामना 6 सप्टेंबर रोजी असणार आहे. त्यामुळे भारत हा सामना खेळण्यासाठी पाकिस्तानात जाईल का असा प्रश्न आहे.

…तर भारताला पाकिस्तानात जावं लागेल

आशिया चषकात एकूण सहा संघ असून तीन संघाचे दोन गट तयार केले आहेत. भारत, पाकिस्तान आणि नेपाळ एका गटात म्हणजेच अ गटात आहेत, तर बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका दुसऱ्या गटात म्हणजेच ब गटात आहेत. दोन्ही गटातील टॉप दोनमध्ये असलेले संघ सुपर फोरमध्ये क्वालिफाय करतील. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. तर तिसरा संघ नेपाळ आहे. त्यामुळे सुपर फोरमध्ये हे दोन संघ पोहोचतील अशीच चर्चा आहे.

अ गटात भारतीय संघ सर्व सामने जिंकत टॉपला राहिला तर मात्र ब गटातील दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी लढत असेल. पण हा सामना पाकिस्तानातील लाहोरमध्ये असणार आहे. जर भारतीय संघ अ गटात दुसऱ्या स्थानी राहिला तर मात्र श्रीलंकेत सामना खेळावा लागेल. त्यामुळे सामन्याचं गणित कसं जुळून येतं यावर सर्व काही अवलंबून आहे.

कसा स्पर्धेचा फॉर्मेट

आशिया कप स्पर्धा वनडे फॉर्मेट असणार आहे. साखळी फेरी, सुपर फोर आणि अंतिम फेरी असे एकूण 13 सामने खेळले जाणार आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी