AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात येताच आयपीएल 2025 बाबत आर अश्विनने घेतला मोठा निर्णय, म्हणाला…

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना संपताच फिरकीपटू आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. त्यानंतर लगेचच मायदेशी परतला आहे. त्याचं घरी जोरदार स्वागत करण्यात आलं. दरम्यान, आर अश्विनने आयपीएल 2025 बाबत मोठी घोषणा केली आहे.

भारतात येताच आयपीएल 2025 बाबत आर अश्विनने घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 19, 2024 | 2:36 PM
Share

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर फिरकीपटू आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. इतकंच काय तर दोन सामन्यांसाठी टीमसोबत न थांबताच आर अश्विन घरी परतला आहे. आर अश्विन याचं घरी जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी एअरपोर्टवर पत्रकारांनी त्याला गराडा घातला. तसेच प्रश्नांचा भडिमार केला. मात्र त्याने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. पण जेव्हा घरी पोहोचला तेव्हा मात्र त्याने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली. क्रिकेटमधील आतापर्यंतचा प्रवास, कर्णधारपद न मिळाल्याचं दु:ख, आयपीएल खेळणार की नाही असे एक ना अनेक प्रश्न त्याला विचारण्यात आले. या सर्व प्रश्नांची त्याने सडेतोडपणे उत्तरं दिली. भारतीय संघाचं नेतृत्व करायला न मिळाल्याचं दु:ख आहे का? तेव्हा अश्विन म्हणाला की, आता या बाबत बोलण्यात काहीच अर्थ नाही. आता हा विषय संपला आहे. पण याबाबत मला काहीच पश्चाताप नाही. मी दुरून पश्चाताप झालेल्या अनेकांना पाहिलं आहे. पण मला असं आयुष्य जगायचं नाही.

अचानक निवृत्ती घेण्याबाबत काही निराशा आहे का? त्यावर आर अश्विनने सांगितलं की, असं काहीच घडलं नाही. तसेच त्याने या बातम्यांचं खंडन केलं आहे. मी हसत आहे, मी आनंदी असल्याचं तुम्ही पाहू शकता. त्यानंतर त्याला आयपीएल 2025 स्पर्धेत खेळणार की नाही असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अश्विनने सांगितलं की, ‘मी चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळणार आहे आणि मी अधिक काळ खेळण्याची इच्छा ठेवली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. अश्विनचं क्रिकेट पूर्ण झालं असं मला वाटत नाही. अश्विनने भारतीय क्रिकेटर म्हणून फक्त कार्यकाळ पूर्ण केला आहे. बस एवढंच सांगू इच्छितो.’

आर अश्विनने भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये एका उंचीवर नेऊन ठेवण्यात मदत केली आहे. 106 कसोटी सामन्यात त्याने 537 विकेट घेतल्या आहेत. भारतासाठी 500 हून अधिक बळी घेणारा दुसरा गोलंदा आहे. इतकंच भारताने 2011 मध्ये वनडे वर्ल्डकप जिंकला होता. या संघात आर अश्विन होता. दरम्यान, आयपीएल मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने आर अश्विनला रिलीज केलं होतं. त्यानंतर 9.25 कोटींची बोली लावून चेन्नईने आपल्या संघात घेतलं आहे. 2015 नंतर आर अश्विन चेन्नई सुपर किंग्समध्ये परतला आहे.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.