AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : इंग्लंडचा चौथ्या सामन्यात 6 विकेट्सने धुव्वा, टीम इंडियाचा ऐतिहासिक मालिका विजय

England Women vs India Women 4th T20I Match Result : महिला ब्रिगेडने इंग्लंडमध्ये इतिहास रचला आहे. भारताने इंग्लंडमध्ये 2006 नंतर पहिल्यांदा टी 20i मालिक जिंकली आहे.

ENG vs IND : इंग्लंडचा चौथ्या सामन्यात 6 विकेट्सने धुव्वा, टीम इंडियाचा ऐतिहासिक मालिका विजय
Jemimah Rodrigues and Richa GhoshImage Credit source: bcci women X Account
| Updated on: Jul 10, 2025 | 4:20 AM
Share

वूमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये इतिहास घडवला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडवर चौथ्या टी 20i सामन्यात 6 विकेट्सने मात करत विजय मिळवला आहे. इंग्लंडने भारताला विजयासाठी 127 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने ते आव्हान 18 बॉलआधी 4 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. भारताने 3 ओव्हरआधीच हे आव्हान पूर्ण केलं. भारताचा हा या 5 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा विजय ठरला. भारताने यासह ही मालिका आपल्या नावावर केली. भारताने यासह मालिकेत 3-1 अशा फरकाने आघाडी मिळवली आहे.

टीम इंडियाच्या विजयात स्मृती मंधाना, शफाली वर्म, जेमीमाह रॉड्रिग्स आणि कर्णधार हरमनप्रीत कौर या चौघींनी बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. शफाली आणि स्मृती सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आणि भारताचा विजय निश्चित केला. स्मृती आणि शफालीने 41 बॉलमध्ये 56 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर शफाली आठव्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर आऊट झाली. शफालीने 19 बॉलमध्ये 31 रन्स केल्या.

शफालीनंतर स्मृती मंधानाही आऊट झाली. स्मृती अर्धशतक ठोकण्याची संधी होती. मात्र स्मृती तसं करण्याआधीच इंग्लंडने तिला आऊट केलं. स्मृतीने 31 बॉलमध्ये 5 फोरसह 32 रन्स केल्या.

त्यानंतर हरमनप्रीत कौर आणि जेमीमाह रॉड्रिग्स या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 48 रन्सची पार्टनरशीप केली. या भागीदारीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. हरमनप्रीत कौर भारताला विजयासाठी 10 धावा हव्या असताना बाद झाली. हरमनप्रीतने 25 बॉलमध्ये 26 रन्स केल्या. त्यानतंर अमनज्योत कौर 2 धावा करुन आऊट झाली. तर जेमीमाह आणि रिचा घोष या जोडीने भारताला विजयी केलं. जेमीमाहने नाबाद 24 धावा केल्या. तर रिचा 7 धावांवर नाबाद परतली.

इंग्लंडची बॅटिंग

दरम्यान त्याआधी इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या सोफी डंकले आणि कॅप्टन टॅमी ब्यूमोंट या दोघींचा अपवाद वगळता एकीलाही भारतीय गोलंदाजांसमोर 20 पेक्षा पुढे जाता आलं नाही. त्यामुळे भारताला इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 126 धावांवर रोखण्यात यश आलं. टीम इंडियाकडून अमनज्योत कौर आणि दीप्ती शर्मा या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट्स घेतल्या. तर श्री चरणी आणि राधा यादव या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. मात्र राधाने चरणीच्या तुलनेत चिवट बॉलिंग केली. त्यामुळे राधाला वूमन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

टीम इंडिया मालिकेत 3-1 ने आघाडीवर

2006 नंतर पहिला मालिका विजय

दरम्यान टीम इंडियाने या मालिका विजयासह अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवली आहे. भारताने 19 वर्षांची प्रतिक्षा संपवली आहे. भारताने याआधी इंग्लंडमध्ये 2006 साली एकमेव सामना जिंकत इतिहास घडवला होता. त्यानंतर आता भारताने मालिका जिंकण्याची कामगिरी करुन दाखवली आहे. आता उभयसंघातील पाचवा आणि अंतिम सामना हा 12 जुलै रोजी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे आयोजित करण्यात आला आहे.

Follow Us
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू.
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल.
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण...
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण....
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती.
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी.
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर.
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले...
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष.
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव.
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले "हे आधीच..
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले