AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आणखी चांगला क्रिकेटर होऊ शकलो असतो’, वीरेंद्र सेहवागने क्रिकेट सोडल्यानंतर 6 वर्षांनी व्यक्त केली खंत, म्हणाला…

वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतकं ठोकली आहेत. त्याने 104 कसोटी सामन्यांत 8000 हून अधिक धावा केल्या आहेत.

'आणखी चांगला क्रिकेटर होऊ शकलो असतो', वीरेंद्र सेहवागने क्रिकेट सोडल्यानंतर 6 वर्षांनी व्यक्त केली खंत, म्हणाला...
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 4:48 PM
Share

मुंबई : भारतीय संघाचा (Team India) सर्वांत स्फोटक फलंदाज अशी अनोखी ओळख असणारा दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) 9 जून रोजी एक मोठा खुलासा केला. त्याने योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळालं असतं तर आणखी चांगला खेळ करु शकलो असतो अशी खंत व्यक्त केली. मंसूर अली खान पतौडी(Mansoor Ali Khan Pataudi), सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) आणि क्रिस श्रीकांत (Kris Srikanth) यांनी फुटवर्क ठिक करायला मदत केली खरी पण तीच मदत लवकर मिळाली असती तर बरं झालं असतं असं सेहवाग म्हणाला. वीरेंद्र सेहवागने 2015 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. दरम्यान त्याने 104 कसोटी सामन्यांत 8000 हून अधिक धावा केल्या आहेत. तो एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतकं ठोकली आहेत. सेहवागने माजी क्रिकेटर संजय बांगर (Sanjay Bangar) यांच्यासोबत मिळून Cricuru नावाचे एक क्रिकेट लर्निंग अॅप सुरु केले आहे. ज्याद्वारे क्रिकेट शिकू इच्छिनाऱ्यांना फिस देऊन क्रिकेटबाबत महत्वाच्या टीप्स मिळणार आहेत. (Former Indian Cricketer Virendra Sehwag says Sunil Gavaskar Kris Srikanth Pataudi Helped me For Improving Footwork Wish I got This Advice Early)

या अॅपच्या लॉचिंग वेळी सेहवाग म्हणाला, ”मी जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आलो. तेव्हा अनेकांनी माझ्या फुटवर्कवर टीका केली होती. पण कोणीच मला त्यात सुधार आणण्याबाबत काही सांगितले नाही. अखेर पतौडी, सुनील गावस्कर आणि क्रिस श्रीकांत यांनी मला फुटवर्कमध्ये सुधारणेबाबत चांगले सल्ले दिले. ज्यामुळे मी माझ्या खेळात बराच सुधार आणू शकलो. पण हेच सल्ले मला आधी मिळाले असते तर मी आणखी धावा करुन खेळ सुधारु शकलो असतो.”

क्रिकेटही शिका ऑनलाईन

सेहवाग आणि बांगर यांनी मिळून सुरु केलेल्या Cricuru या लर्निंग अॅपमुळे घरबसल्या क्रिकेटमधील डावपेच शिकता येणार आहेच. हे एक क्रिकेटच्या कोचिंग क्लासप्रमाणे असेल. याठिकाणी क्रिकेटपटूसोबत संभाषण आणि शिकवणीही मिळेल. अनेक क्रिकेटर्स महत्त्वपूर्ण टीप्स याठिकाणी देतील ज्यामुळे मैदानात खेळताना नवख्या क्रिकेटपटूंना फार मदत होईल. फीज भरुन या अॅपवर शिकवणी घेता येणार आहे.

सेहवागची क्रिकेट कारकीर्द

अनेक वर्ष भारताचा सलामीवीर राहिलेला वीरेंद्र सेहवाग 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघातही होता. त्याने 104 कसोटी सामन्यांत 8 हजार 586 धावा केल्या आहेत. ज्यात 23 शतकांसह 32 अर्धशतकांचा समावेश होतो. 6 वेळा त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 200 हून अधिक धावा केल्या आहेत. तो असा एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतकं ठोकली आहेत. यासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये सेहवागने 251 सामन्यांत 8 हजार 273 धावा केल्या आहेत. ज्यात 15 शतकांसह 38 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने एक द्विशतक ही ठोकलं आहे. टी-20 मध्ये केवळ 19 सामनेच खेळल्याने सेहवागने त्यात 2 अर्धशतकांसह 394 धावांच केल्या आहेत. सेहवाग फिरकी गोलंदाजीही करत असून त्याने 104 कसोटी सामन्यांत 40 विकेट्स मिळवले आहेत. तर 251 एकदिवसीय सामन्यात 96 विकेट्स पटकावले आहेत.

हे ही वाचा :

राहुल द्रविडने 13 वर्षांपूर्वी दिलेल्या ‘त्या’ सल्ल्यामुळे बदललं जीवन, भारताच्या दिग्गज खेळाडूची कबुली

WTC Final : भारतीय संघ मोठ्या पेचात, महत्वाच्या खेळाडूला बाहेर बसवण्याची शक्यता

WTC Final : ‘हे’ दोन खेळाडू करु शकतात कमाल, माजी भारतीय क्रिकेटपटूची भविष्यवाणी

(Former Indian Cricketer Virendra Sehwag says Sunil Gavaskar Kris Srikanth Pataudi Helped me For Improving Footwork Wish I got This Advice Early)

Follow Us
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...