AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीकडून जखमेवर मीठ

Afridi reaction : वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया संघाकडून फायनल सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर एकीकडे संपूर्ण देश भारताच्या पाठिशी उभा असताना पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहीद आफ्रिदीने मात्र जखमेवर मीठ चोळणारी प्रतिक्रिया दिली आहे.

भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीकडून जखमेवर मीठ
afridi
| Updated on: Nov 21, 2023 | 7:50 PM
Share

World cup 2023 : टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा स्थितीतही संपूर्ण देश टीम इंडियाच्या पाठीशी उभा आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही खेळाडूंची सामन्यानंतर भेट घेत त्यांना धीर दिला. भारतीय संघाने ज्या प्रकारे सलग 10 सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यासाठी सर्वच स्तरातून त्यांचं कौतूक होत आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ सरस ठरला. यावर मात्र पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने प्रतिक्रिया देताना भारताला उकसवण्याचा प्रयत्न केला आहे.

शाहीद आफ्रिदीचा टोला

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने थेट भारतीय संघाला टोला लगावला आहे. एका खासगी पाकिस्तानी टीव्ही चॅनलवर बोलताना आफ्रिदी म्हणाला की, आता जेव्हा आपण सतत सामने जिंकतो तेव्हा अतिआत्मविश्वासही वाढतो. यानंतर शाहिद आफ्रिदी म्हणाला की ती गोष्ट (अति आत्मविश्वास) तुम्हाला मारून टाकते. शाहिद आफ्रिदीचे हे वक्तव्य व्हायरल होत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक जण टीकाही करत आहेत.

भारतील संघाला सपोर्ट

शाहिद आफ्रिदीच नाही तर अनेक पाकिस्तानी लोकांनी वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाच्या पराभवावर कमेंट केल्या आहेत. सध्या भारतीय संघाने विश्वचषक गमावला असला तरी आपल्या शानदार कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीम इंडियाला प्रोत्साहन दिले. सोशल मीडियावर लोक विविध पोस्ट करून भारतीय संघाचे समर्थन करत आहेत.

ऑस्ट्रेलियाकडून ६ गडी राखून पराभव

विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये भारतीय संघ चमकदार कामगिरी करु शकला नाही. भारतीय संघाने १० सामने जिंकल्याने भारतीयांच्या आशा नक्कीच वाढल्या होत्या. पण भारतीय संघ वर्ल्डकप जिंकेल अशी अपेक्षा असताना मात्र भारताला पराभवाचा सामना करावा लागला आणि अनेकांचं स्वप्न भंगलं. ऑस्ट्रेलियाच्या संघाने टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव करत ट्रॉफी जिंकली.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.