मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पांड्याला 4 जणांनी त्रास दिला? आता कर्णधारपद कोणाच्या खांद्यावर?
आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा प्रवास साखळी फेरीतच संपला. खरं तर सर्वात आधीच मुंबईचा संघ या स्पर्धेतून आऊट झाला. दिग्गज खेळाडू असूनही अशी स्थिती झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. असं असताना आता संघातून वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत.

आयपीएल स्पर्धेत दबदबा असलेल्या मुंबई इंडियन्स संघाची स्पर्धेतील स्थिती नाजूक झाली. आयपीएल 2026 स्पर्धेत दहा सामने खेळल्यानंतरच मुंबई इंडियन्स आऊट होणार हे चित्र स्पष्ट झालं होतं. त्यामुळे हार्दिक पांड्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्यात मुंबई इंडियन्स संघात बऱ्याच उलथापालधी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. काही रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या कर्णधारपदच नाही तर संघ सोडणार असल्याचं सांगितलं जात आहे. आता हार्दिक पांड्याला संघातील चार खेळाडूंची साथ मिळाली नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. चार जण कोण? हे काही स्पष्ट नाही. पण आग लागण्यापूर्वीच धूर निघाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांचे फड रंगले आहेत.
रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मॅनेजमेंटने त्याचं म्हणणंही मान्य केलं आहे. दुसरीकडे, एका पत्रकाराच्या दाव्यानुसार हार्दिक पांड्या जेव्हापासून मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला, तेव्हापासून चार खेळाडूंची त्याला साथ मिळाली नाही. आता हे चार खेळाडू कोण? हे मात्र स्पष्ट नाही. दाव्यानुसार, याच कारणामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात संघाची हाराकिरी झाली. यंदाच्या पर्वात मुंबई इंडियन्सने 14 पैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवला, तर 10 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
WHAT HURT HARDIK PANDYA THE MOST. ⁉️
– Pandya was immensely hurt with the fact that senior players, who demanded 100% commitment when he played T20is for India, were not exactly returning the favour when Hardik was MI captain. (PTI). pic.twitter.com/vmXoQ8Py8K
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 29, 2026
HARDIK DECIDED TO QUIT MID SEASON.
– Hardik Pandya was mentally stressed and completely exhausted after disastrous IPL.
Pandya set to quit MI and conveyed this to the team management mid-season. (PTI). pic.twitter.com/jf72RVuaHe
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 29, 2026
हार्दिक पांड्यानंतर कर्णधार कोण?
हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स संघ सोडला तर कर्णधारपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हा प्रश्न आहे. फ्रेंचायझीमध्ये या पदासाठी तीन दावेदार आहे. यात पहिलं नाव सूर्यकुमार यादवचं आहे. पण त्याचं वय आणि त्याची कामगिरी पाहता त्याच्याकडे कर्णधारपद सोपवणं शक्य दिसत नाही. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह या शर्यतीत आहे. त्याने या पर्वात कर्णधारपद भूषवलं होतं. त्यात मुंबईला यशही मिळालं होतं. त्यामुळे त्याच्या पर्याय समोर असेल. तिसरा पर्याय हा दूरदृष्टी ठेवून असणार आहे. तिलक वर्माकडे कर्णधारपद सोपवलं जाऊ शकतं. त्याने टीमसाठी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचं नावही आघाडीवर आहे. त्यामुळे बुमराह किंवा तिलक या पैकी एकाची निवड होऊ शकते.
