AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी हर्षित राणाची निवड झाली तरी कशी? वर्ल्डकप विजेत्या खेळाडूचा थेट प्रश्न

आशिया कप स्पर्धेत वेगवान गोलंदाज हर्षित राणा याचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्या निवडीवरून आता वाद पेटला आहे. माजी क्रिकेटपटू आणि वर्ल्डकप विजेत्या खेळाडूने त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नेमकं काय म्हणाले ते जाणून घ्या..

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी हर्षित राणाची निवड झाली तरी कशी? वर्ल्डकप विजेत्या खेळाडूचा थेट प्रश्न
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी हर्षित राणाची निवड झाली तरी कशी? वर्ल्डकप विजेत्या खेळाडूचा थेट प्रश्न Image Credit source: PTI
| Updated on: Aug 20, 2025 | 6:07 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 15 खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत काही नावांवरून आता चर्चांना उधाण आलं आहे. या संघात हर्षित राणाला स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. माजी क्रिकेटपटू आणि 1983 वर्ल्डकप विजेत्या संघात असलेल्या के श्रीकांत यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. हार्षित राणा संघात कसा आला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्याच्या निवडीमुळे के श्रीकांत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयपीएलमध्ये हर्षित राणाची कामगिरी निराशाजनक होती. त्यामुळे त्याची निवड करून काय संदेश द्यायचा आहे? हर्षित राणाऐवजी संघात वॉशिंग्टन सुंदरला स्थान मिळायला हवं होतं, असं मत के श्रीकांत यांनी व्यक्त केलं आहे.

श्रीकांत त्यांच्या युट्यूब चॅनेलवर म्हणाले की, ‘हर्षित राणा कुठून आला? आयपीएलमध्ये त्याची कामगिरी खूपच खराबहोती. त्याच्या इकोनॉमी रेट प्रति ओव्हर हा 10 पेक्षा जास्त होता. प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांना तुम्ही काय संदेश देत आहात?’ दुसरीकडे, शिवम दुबे ऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळायला हवी होती असं मतही त्यांनी व्यक्त केलं. श्रीकांत म्हणाला की, ‘ते तिलक वर्माला सहावा गोलंदाज ठेवतील किंवा अभिषेक शर्मा किंवा शिबम दुबे.. त्यांनी आयपीएलमध्ये क्वचितच गोलंदाजी केली असेल. जर तुम्हाला जर असा खेळाडू पाहीजे की जो आठव्या क्रमांकावर फलंदाजीसह गोलंदाजी करेल तर तो वॉशिंग्टन सुंदर आहे. शिवम दुबेचा नंबर कुठूनही योग्य वाटत नाही.’

आशिया कप स्पर्धेत श्रेयस अय्यरची नियुक्ती न झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. इतकंच काय तर यशस्वी जयस्वाललाही संघात स्थान मिळालं नाही. या दोन्ही फलंदाजांनी टी20 फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण असं असूनही त्यांना संघात स्थान मिळालं नाही. दुसरीकडे, शुबमन गिलची संघात एन्ट्री झाली असून त्याच्याकडे उपकर्णधारपद सोपवलं आहे.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचे उपमुख्यमंत्री म्हणून सभागृहात पहिले भाषण
सुनेत्रा पवार यांचे उपमुख्यमंत्री म्हणून सभागृहात पहिले भाषण.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप.
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा.