AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी हर्षित राणाची निवड झाली तरी कशी? वर्ल्डकप विजेत्या खेळाडूचा थेट प्रश्न

आशिया कप स्पर्धेत वेगवान गोलंदाज हर्षित राणा याचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्या निवडीवरून आता वाद पेटला आहे. माजी क्रिकेटपटू आणि वर्ल्डकप विजेत्या खेळाडूने त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. नेमकं काय म्हणाले ते जाणून घ्या..

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी हर्षित राणाची निवड झाली तरी कशी? वर्ल्डकप विजेत्या खेळाडूचा थेट प्रश्न
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी हर्षित राणाची निवड झाली तरी कशी? वर्ल्डकप विजेत्या खेळाडूचा थेट प्रश्न Image Credit source: PTI
| Updated on: Aug 20, 2025 | 6:07 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 15 खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत काही नावांवरून आता चर्चांना उधाण आलं आहे. या संघात हर्षित राणाला स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. माजी क्रिकेटपटू आणि 1983 वर्ल्डकप विजेत्या संघात असलेल्या के श्रीकांत यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. हार्षित राणा संघात कसा आला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्याच्या निवडीमुळे के श्रीकांत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयपीएलमध्ये हर्षित राणाची कामगिरी निराशाजनक होती. त्यामुळे त्याची निवड करून काय संदेश द्यायचा आहे? हर्षित राणाऐवजी संघात वॉशिंग्टन सुंदरला स्थान मिळायला हवं होतं, असं मत के श्रीकांत यांनी व्यक्त केलं आहे.

श्रीकांत त्यांच्या युट्यूब चॅनेलवर म्हणाले की, ‘हर्षित राणा कुठून आला? आयपीएलमध्ये त्याची कामगिरी खूपच खराबहोती. त्याच्या इकोनॉमी रेट प्रति ओव्हर हा 10 पेक्षा जास्त होता. प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांना तुम्ही काय संदेश देत आहात?’ दुसरीकडे, शिवम दुबे ऐवजी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळायला हवी होती असं मतही त्यांनी व्यक्त केलं. श्रीकांत म्हणाला की, ‘ते तिलक वर्माला सहावा गोलंदाज ठेवतील किंवा अभिषेक शर्मा किंवा शिबम दुबे.. त्यांनी आयपीएलमध्ये क्वचितच गोलंदाजी केली असेल. जर तुम्हाला जर असा खेळाडू पाहीजे की जो आठव्या क्रमांकावर फलंदाजीसह गोलंदाजी करेल तर तो वॉशिंग्टन सुंदर आहे. शिवम दुबेचा नंबर कुठूनही योग्य वाटत नाही.’

आशिया कप स्पर्धेत श्रेयस अय्यरची नियुक्ती न झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. इतकंच काय तर यशस्वी जयस्वाललाही संघात स्थान मिळालं नाही. या दोन्ही फलंदाजांनी टी20 फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण असं असूनही त्यांना संघात स्थान मिळालं नाही. दुसरीकडे, शुबमन गिलची संघात एन्ट्री झाली असून त्याच्याकडे उपकर्णधारपद सोपवलं आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.