
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. 7 फेब्रुवारीपासून टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना अमेरिकेशी होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची पूर्ण तयारी झाली आहे. पण सामन्याच्या काही तासाआधी टीम इंडियाला धक्का बसला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. वेगवान गोलंदाज आणि स्पर्धेत ट्रम्प कार्ड ठरेल असं भाकीत वर्तवलेल्या हर्षित राणाला दुखापत झाली आहे. भारतीय संघाच्या सराव सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली. त्यामुळे सामना अर्धवट सोडून गेला होता. रिपोर्टनुसार, सामन्याच्या एक दिवस आधी आता बाहेर गेल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहेत. स्पर्धेला मुकला की सामन्याला हे मात्र काही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. दुसरं त्याची दुखापत किती गंभीर याबाबतही कळू शकलेलं नाही.
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी सराव सामन्यात निवडलेल्या प्लेइंग 11 मध्ये हर्षित राणाला जागा मिळाली होती. त्यामुळे त्याचं प्लेइंग 11 मधील स्थान पक्कं मानलं जात होतं. पण 4 फेब्रुवारीला दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे सामना अर्धवट सोडून तंबूत परतला. त्याने या सामन्यात फक्त एकच षटक टाकलं. त्यामुळे त्याला झालेली दुखापत गंभीर नाही ना? अशी चिंता क्रीडाप्रेमी व्यक्त करत होते. पण स्पर्धा सुरू होण्याआधीच त्याला गाशा गुंडाळावा लागणार असं बोललं जात आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, हर्षित राणा पूर्णपणे फिट नाही. त्याच्या गुडघ्याला झालेली दुखापत गंभीर असल्याचं समोर आलं आहे. या स्पर्धेत खेळेल अशी स्थिती नाही. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने याबाबत काही सांगितलं नाही. सूर्यकुमार यादवने इतकंच सांगितंल की, स्पर्धेतून आऊट झालेला नाही. पण कर्णधाराच्या म्हणण्याचा अर्थ काढायचा झाला तर, हार्षित राणाची स्थिती काही चांगली नही. हर्षित राणा या स्पर्धेत खेळणार की नाही हे आता शुक्रवारी संध्याकाळीच स्पष्ट होईल.
भारताचा पहिला सामना अमेरिकेशी होणार आहे. भारताचा संघ अमेरिकेच्या तुलनेत खूपच बलाढ्य आहे. त्यामुळे हर्षित राणाची गरज या सामन्यात भासणार नाही. पण पुढे या स्पर्धेची रंगत वाढत गेल्यानंतर हर्षित राणाची उणीव नक्कीच भासणार आहे. कारण हर्षित राणा गोलंदाजीसोबत मोठ फटके मारण्यात तरबेज आहे. त्यामुळे त्याच्या जागी खेळाडूची निवड करणं बीसीसीआयला कठीण जाईल. हर्षित राणा स्पर्धेतून आऊट झाल्यास भारताकडे वेगवान गेलंदाजीसाठी अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह हे दोन पर्याय शिल्लक राहतात. तर हार्दिक पांड्या तिसरा वेगवान गोलंदाज असेल.