AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : कॅप्टन सूर्याच्या नेतृत्वात टीम इंडियाची विजयी हॅटट्रिक, मालिका जिंकल्यानंतर काय म्हटलं?

Suryakumar Yadav India vs Bangladesh 3rd T20i Post Match: टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात अनेक विक्रम उद्धस्त केले. संजू सॅमसन या विजयाचा खरा शिल्पकार ठरला. टीम इंडियाच्या विजयानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादवने काय म्हटलं जाणून घ्या.

IND vs BAN : कॅप्टन सूर्याच्या नेतृत्वात टीम इंडियाची विजयी हॅटट्रिक, मालिका जिंकल्यानंतर काय म्हटलं?
Suryakumar yadav ind vs ban 3rd t20i post matchImage Credit source: social media
| Updated on: Oct 13, 2024 | 1:29 AM
Share

टीम इंडियाने बांगलादेशवर तिसऱ्या आणि टी20I सामन्यात 133 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने यासह हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये बांगलादेशला 3-0 अशा फरकाने क्लिन स्वीप दिला. टीम इंडियाने बांगलादेशला 298 धावांचं आव्हान दिलं होतं. बांगलादेशला या प्रत्युत्तरात 7 विकेट्स गमावून 164 धावांपर्यंतच पोहचता आलं. संजू सॅमसन हा टीम इंडियाच्या तिसऱ्या विजयाचा शिल्पकार ठरला. संजूने 47 बॉवमध्ये 111 रन्स केल्या. संजूने 22 बॉलमध्ये अर्धशतक तर 40 चेंडूत शतक पूर्ण केलं. संजूने षटकारासह अर्धशतक तर चौकार ठोकत शतक पूर्ण केलं. संजू या संपूर्ण खेळीत निर्भीडपणे खेळला. कॅप्टन सूर्यकुमार यादवने त्याला अप्रतिम साथ दिली. सूर्याने 75 तर हार्दिकने 47 धावांचं योगदान दिलं.

त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांना बांगलादेशला 164 धावांवर रोखण्यात यश आलं. टीम इंडियाकडून रवी बिश्नोई याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मयंक यादवने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश रेड्डी या दोघांनी 1-1 विकेट घेतली. टीम इंडियाच्या मालिका विजयानंतर कर्णधार सूर्यकुमारने आनंद व्यक्त केला. तसेच सूर्या संजूबाबत काय म्हणाला? हे जाणून घेऊयात.

कॅप्टन सूर्या काय म्हणाला?

“आम्ही एक टीम म्हणून खूप काही प्राप्त केलं. मला माझ्या टीममद्ये निस्वार्थी खेळाडू हवेत. आम्हाला निस्वार्थी टीम बनायचंय. हार्दिकने सांगितलं त्यानुसार आम्हाला मैदानावर आणि मैदानाबाहेरही एकमेकांच्या कामगिरीचा आनंद घ्यायचा आहे. शक्य तितका वेळ घालवायचा आहे. त्यानुसार ती मैत्री मैदानावर सुरु आहे. आम्ही थोडी मजा करत आहोत”, असं सूर्याने म्हटलं. सूर्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान असं म्हणाला.

“आमच्या टीम मिंटिगमध्येही हाच विषय असतो. तसेच मालिकेच्या सुरुवातीला गौतीभाईने (मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर) हेच म्हटलं होतं की संघापेक्षा कोणीही मोठा नाही. तुम्ही 99 किंवा 49 किंवा किती धावांवर खेळत असाल, तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला टीमसाठी बॉल बाहेर मारायाचाय, तर तुम्हाला तसं करता यायला हवं. संजू सॅमसन यानं नेमकं तसंच केलं. मी संजूसाठी खूप आनंदी आहे”,अशा शब्दात सूर्याने संजूचं कौतुक केलं.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमान, लिटन दास (विकेटकीपर), तन्झिद हसन, तॉहिद हृदॉय, महमुदुल्ला, महेदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान आणि तांझिम हसन साकिब.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि मयंक यादव.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?