AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Test Championship 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल कुठे? ICCची मोठी घोषणा, वाचा….

ICC Announces Venue For World Test Championship 2023 : आयसीसीनं जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या सध्याच्या आणि पुढील फेरीच्या अंतिम फेरीच्या यजमानांची घोषणा केली आहे. अंतिम सामना 2023 मध्ये खेळवला जाणार आहे.

World Test Championship 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल कुठे? ICCची मोठी घोषणा, वाचा....
World Test Championship 2023Image Credit source: social
| Updated on: Jul 27, 2022 | 8:26 AM
Share

मुंबई  : ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (World Test Championship 2023) अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये खेळला जाईल? न्यूझीलंडकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनचं जेतेपद कोणते संघ हिसकावून घेऊ शकेल?  यावर अंतिम फेरीची घोडदौड सुरू असल्यानं अद्याप निर्णय झालेला नाही आणि पुढील वर्षी होणाऱ्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी संघ सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र, फायनल कुठं होणार हे निश्चित झालं आहे. आयसीसीने (ICC) याची घोषणा केली असून अपेक्षेप्रमाणे 2023चा अंतिम सामना लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर (Lords Stadium) खेळवला जाईल . यासोबतच 2024 ते 2027 या कालावधीतील पुरूष आणि महिलांसाठीच्या भावी दौऱ्याच्या कार्यक्रमालाही मान्यता देण्यात आली आहे. ICC ची वार्षिक परिषद सोमवार 25 जुलै आणि मंगळवार 26 जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये अनेक प्रमुख निर्णयांची औपचारिक घोषणा करण्यात आली होती. 2019 मध्ये सुरू झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या सध्याच्या सायकलचे ठिकाण आणि पुढील अंतिम फेरीबाबतही निर्णय घेण्यात येणार होता. यावेळी फायनल लॉर्ड्सवर होणार असल्याची चर्चा बराच काळ सुरू होती. आयसीसीने याची पुष्टी केली.

लॉर्ड्सवर सलग दोन फायनलमध्ये

मंगळवारी घेतलेल्या निर्णयांमध्ये असं सांगण्यात आलं की, आयसीसी बोर्डाने लॉर्ड्सवर 2023 आणि 2025 ची अंतिम फेरी खेळण्यास मान्यता दिली आहे. 2021 मध्ये सुरू झालेली कसोटी चॅम्पियनशिपची सध्याची फेरी 2023 मध्ये संपेल. त्यानंतर लॉर्ड्सवरील अंतिम फेरीनंतर तिसरी फेरी सुरू होईल. ही फेरी 2025 पर्यंत चालेल. कसोटी चॅम्पियनशिपचे पहिला राऊंड 2019 मध्ये सुरू झाला आणि 2021 मध्ये संपला.

लॉर्ड्सला पहिल्या फायनलमध्ये पराभव

2021 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला फायनल झाला होता. जो न्यूझीलंडने जिंकला होता. हा अंतिम सामना साउथॅम्प्टनमध्ये खेळला गेला होता. पण प्रत्यक्षात तो लॉर्ड्सवरच होणार होता. मग कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भयानक लाटेमुळे अगियास बॉल स्टेडियममध्ये स्वतःचे हॉटेल असल्यानं ते साउथम्प्टनला हलवावं लागलं. भारत आणि न्यूझीलंडच्या संघांना संसर्गापासून वाचवण्यासाठी या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. आता 2023 मध्ये WTC फायनल त्याच्या मूळ ठिकाणी परत येईल.

भारत अंतिम फेरीत पोहोचेल का?

आता प्रश्न असा आहे की, भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचणार का? टीम इंडिया यावेळी पहिल्या फायनलमधील निराशेचे यशात रूपांतर करू शकेल का? याचे उत्तर पुढच्या वर्षीच मिळेल. टीम इंडिया सध्या टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. संघाला आता बांगलादेशविरुद्ध 2 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामने खेळायचे आहेत. अंतिम फेरीत जाण्याची कोणतीही संधी जिवंत ठेवण्यासाठी भारताला सर्व 6 सामने जिंकावे लागतील. पुढील वर्षी भारत-ऑस्ट्रेलिया मालिका होणार आहे. सध्या दक्षिण आफ्रिका अव्वल, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या आणि पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.