AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC T 20 World Cup 2022 | मी निराश झालोय, दुखावलोय… देशातल्या क्रिकेटप्रेमींना ज्याच्यावर विश्वास तोच काय म्हणतोय पाहा!

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये भारताचा दारुण पराभव झालाय. क्रिकेट प्रेमींचं हे दुःख लाडक्या क्रिकेटपटूने नेमक्या शब्दात मांडलंय...

ICC T 20 World Cup 2022 | मी निराश झालोय, दुखावलोय... देशातल्या क्रिकेटप्रेमींना ज्याच्यावर विश्वास तोच काय म्हणतोय पाहा!
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 11, 2022 | 10:31 AM
Share

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये (ICC T 20 World Cup 2022) इंग्लंड (India England Match) विरोधातील सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. विशेषतः इंग्लंडविरोधातला असा पराभव भारतीय क्रिकेटप्रेमींना अत्यंत वेदनादायी ठरलाय. करोडो भारतीयांच्या मनातील याच भावना हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) मांडल्यात. खरं तर हा पराभव त्याच्या मनाला खोलवर जखम करणारा ठरलाय, या संदर्भाचं एक ट्विट त्याने केलंय.

हार्दिक पांड्याने या पराभवाबद्दल एक ट्विट केलंय. त्याने लिहिलंय, मी निराश झालोय. दुखावलोय. मला खूप धक्का बसलाय..

मॅचचा असा अंत स्वीकारणं सर्वांसाठीच कठीण आहे. माझ्या टीममेटसोबत जे नातं तयार झालंय, ते खूप जवळून अनुभवलं. प्रत्येक टप्प्यावर आम्ही एकमेकांसाठी लढलो. अनेक महिन्यांपासून सर्वच सहकारी ज्या समर्पणाने आणि मेहनतीने झोकून देऊन काम करतायत, त्या सर्वांचा मी ऋणी आहे.

खरं तर जे झालं, हो घडायला नको होतं. पण ही लढाई सुरूच राहील, असंही हार्दिक पांड्याने म्हटलंय.

ICC टी 20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमीफायनल राऊंडमध्ये भारताचा इंग्लंड विरुद्ध पराभव झाला. इंग्लंडने भारताला 10 विकेट्सनं हरवलं. स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याने या मॅचमध्ये 33 बॉलवर 63रन काढले. भारताला 168 रन्सचा स्कोअर गाठून दिला. पण इंग्लंडने 16 ओव्हरमध्येच 170 रन काढले. तेदेखील एकही विकेट न गमावता.

10 विकेटने पराभव पत्करल्यानंतर हार्दिक पांड्याच्या वेदना सोशल मीडियावरील पोस्टतून दिसून आल्या.

ऑलराउंडर असलेला हार्दिक पांड्या आता टीम इंडियाचा भावी कॅप्टन म्हणवला जातोय. त्यामुळे इंग्लंडविरोधातील पराभवाबद्दल त्याने लिहिलेल्या भावना, कोट्यवधी भारतीयांच्या मनातील भावनांप्रमाणेच खऱ्या आहेत, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

Follow Us
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण