AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20I World Cup 2026 स्पर्धेतील सामने मुंबईसह एकूण 5 शहरात! फायनल अहमदाबादमध्ये?

ICC T20 World Cup 2026 Venue : आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सामने हे भारत आणि श्रीलंका या देशातील एकूण 8 शहरांमध्ये होणार आहे. जाणून घ्या सामने कुठे कुठे होणार?

T20I World Cup 2026 स्पर्धेतील सामने मुंबईसह एकूण 5 शहरात! फायनल अहमदाबादमध्ये?
ICC T20 World Cup 2026 VenueImage Credit source: Icc Photo
| Updated on: Nov 06, 2025 | 6:59 PM
Share

मेन्स आणि वूमन्स टीम इंडियाने गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करुन दाखवली आहे. भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टी 20I आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यानंतर हरमनप्रीत कौर हीने आपल्या नेतृत्वात भारताला पहिलावहिला वनडे वर्ल्ड कप मिळवून दिला. भारताने अशाप्रकारे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची हॅटट्रिक पूर्ण केली. आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. या स्पर्धेला अजून काही महिने बाकी आहेत. मात्र त्याआधी या स्पर्धेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

स्पर्धेसाठी 20 संघ निश्चित

वर्ल्ड कप स्पर्धेत यंदाही 20 संघ सहभागी होणार आहेत. एकूण 20 संघ अवघ्या काही दिवसांपूर्वी निश्चित झाले आहेत. लवकरच या स्पर्धेचं वेळापत्रक अपेक्षित आहे. मात्र त्याआधी या स्पर्धेतील सामने कुठे आणि कोणत्या शहरात होणार? याबाबत अपडेट समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांसाठी शहरांची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेप्रमाणेच भारत आणि श्रीलंकेकडे आहे. त्यानुसार टी 20I स्पर्धेतील सामने हे 5 शहरात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत वनडे वर्ल्ड कप 2023 च्या तुलनेत कमी शहरांत टी 20I विश्व चषकातील सामन्यांचं आयोजन करण्याबाबत निर्णय झाला. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.

प्रत्येक मैदानात 6-6 सामने

रिपोर्ट्सनुसार, एका शहरात टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रत्येकी 6-6 सामने खेळवण्याबाबत बीसीसीआय अधिकाऱ्यांचं एकमत झालं आहे. आता कोणत्या आणि किती शहरांमध्ये हे सामने होणार? याबाबतही चाहत्यांना उत्सुकता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतातील एकूण 5 शहरांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांचा थरार रंगणार आहे. या 5 शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई आणि कोलकाताचा समावेश आहे.

श्रीलंकेतील 3 शहरांमध्ये सामने?

तसेच मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेतील एकूण 3 शहरांमध्ये या स्पर्धेतील सामन्यांचं आयोजन करण्याची तयारी सुरु आहे. मात्र कोणत्या 3 स्टेडियमला सामन्यांचं आयोजन करण्याचा मान मिळणार? हे अजून निश्चित नाही.

तसेच रिपोर्ट्सनुसार, वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत ज्या स्टेडियममध्ये सामने झाले तिथे टी 20I विश्व चषकातील सामन्याचं आयोजन न करण्याची भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. नुकत्याच झालेल्या या महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने नवी मुंबई, विशाखापट्टणम, गुवाहाटी आणि इंदूरमधील स्टेडियममध्ये खेळवण्यात आले होते.

टी 20i वर्ल्ड कप फायनल अहमदाबादमध्ये

सेमी फायनल-फायनल कुठे?

रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेने सेमी फायनलमध्ये क्वालिफाय केल्यास त्यांना कोलंबोत क्रिकेट सामना खेळण्यासाठी यावं लागेल. तसेच पाकिस्तान अंतिम फेरीत पोहचल्यास महामुकाबला त्रयस्थ ठिकाणी होईल.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक