AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 World Cup: भारताचे 6 खेळाडू कोरोनाबाधित, प्लेइंग XI वर टांगती तलवार, खेळाडू कमी पडले तर उपाय काय?

अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत (U19 Cricket World Cup) भारताची (India U19) घोडदौड सुरु झाली आहे. मात्र या वाटेत कोरोना विषाणू (Covid-19) आडवा आला असल्याचे पाहायला मिळत आहे.

U19 World Cup: भारताचे 6 खेळाडू कोरोनाबाधित, प्लेइंग XI वर टांगती तलवार, खेळाडू कमी पडले तर उपाय काय?
India U-19 (Photo: FILE)
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 21, 2022 | 10:49 AM
Share

मुंबई : अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत (U19 Cricket World Cup) भारताची (India U19) घोडदौड सुरु झाली आहे. मात्र या वाटेत कोरोना विषाणू (Covid-19) आडवा आला असल्याचे पाहायला मिळत आहे. भारत 17 खेळाडूंच्या संघासह या स्पर्धेत पोहोचला आहे. पण, ग्रुप स्टेजमधील आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यापूर्वी भारताचे 6 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. म्हणजेच, केवळ प्लेइंग इलेव्हन बनवू शकतील इतकेच खेळाडू शिल्लक आहेत. आता अशा परिस्थितीत भारतातील आणखी एखादा खेळाडू कोरोनाच्या विळख्यात अडकल्यावर काय होईल हा मोठा प्रश्न आहे. खेळाडू कमी पडले तर काय करायचे? असा सवाल अनेकांना सतावतोय.

तर सर्वप्रथम जाणून घ्या, कोरोनामुळे अनुपलब्ध असलेल्या खेळाडूंबद्दल. म्हणजेच असे खेळाडू जे संघापासून वेगळे ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी पहिले नाव भारताच्या अंडर-19 संघाचा कर्णधार यश धुलचे आहे. दुसरा उपकर्णधार शेख रशीद आहे. याशिवाय फलंदाज सिद्धार्थ यादव, यष्टिरक्षक आराध्या यादव, अष्टपैलू मानव प्रकाश आणि वेगवान गोलंदाज वासू वत्स यांच्या नावाचा समावेश आहे.

युगांडाविरुद्धच्या सामन्यावर काय परिणाम होईल?

या 6 खेळाडूंशिवाय भारताने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 174 धावांनी मोठा विजय नोंदवला. पण, युगांडासोबतच्या तिसऱ्या सामन्यावर याचा काय परिणाम होईल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल, तर त्याचं उत्तर म्हणजे भारत या सामन्यातदेखील त्याच प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरेल, ज्यासह ते आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरले होते. कारण आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले 6 खेळाडू 10 दिवसांच्या क्वारंटाईननंतरच मैदानात परतू शकतील. दरम्यान, भारताने पहिले दोन सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट मिळवले आहे. तसेच युगांडाचे आव्हानही भारतासाठी अवघड नाही. अशा स्थितीत खेळाडूंना दुखापत झाली तरच भारतासमोर समस्या निर्माण होऊ शकते, कारण त्यानंतर संघाकडे कोणताही पर्याय उरणार नाही.

भारताचे आणखी खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास काय होईल?

भारताचे 11 खेळाडू फिट राहिल्यास ही स्पर्धा भारताचा जसा प्रवास सुरू आहे तशीच होईल. परंतु, खेळाडू 11 पेक्षा कमी असतील म्हणजेच प्लेइंग इलेव्हन बनवण्यासाठी खेळाडू उपलब्ध नसतील, तर स्पर्धेची तांत्रिक समिती भारताचे वेळापत्रक पुढे ढकलून ते इतर ठिकाणी पूर्ण करू शकते. स्पर्धेच्या प्लेइंग कंडीशन आणि नियमांमध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे, जे सर्व संघांसाठी आहेत. या नियमाचा फायदा असा आहे की 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या वेगाला यामुळे ब्रेक लागणार नाही.

इतर बातम्या

IND vs SA 2nd ODI LIVE Streaming: कधी आणि कुठे पाहाल सामना

Road Safety World Series च्या आयोजकांनी सचिन तेंडुलकरचे पैसे खाल्ले, मास्टर ब्लास्टरने घेतला मोठा निर्णय

(ICC U-19 World Cup: Covid strikes India U-19 camp, six players ruled out of league)

Follow Us
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...