AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI World Cup 2023 आधी विराट कोहली याचा मोठा निर्णय, टीमची साथ सोडली

Icc World Cup 2023 Team India Virat Kohli | विराट कोहली टीम इंडियाचा प्रमुख फलंदाज आहे. मात्र वर्ल्ड कपआधी विराट कोहली टीम इंडियासोबत नसल्याची माहिती समोर आली आहे. नक्की काय झालं? जाणून घ्या सर्वकाही.

ODI World Cup 2023 आधी विराट कोहली याचा मोठा निर्णय, टीमची साथ सोडली
| Updated on: Oct 02, 2023 | 3:32 PM
Share

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 आधी सर्वच 10 संघ हे सराव सामने खेळत आहेत. टीम इंडियाचा पहिला सराव सामना हा इंग्लंड विरुद्ध होता. मात्र हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अखेर नाईलाजाने रद्द करावा लागला. त्यानंतर आता टीम इंडियाचा दुसरा आणि अखेरचा सराव सामना हा 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. टीम इंडियासमोर या सामन्यात नेदरलँड्सचं आव्हान असणार आहे. हा सामना तिरुवनंतपुरम इथेली ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला या सामन्याआधी विराट कोहली याच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

विराट कोहली याने सामन्याच्या काही तासांआधी टीम इंडियाची साथ सोडली आहे. विराट मुंबईला परतला आहे. विराट काही कारणांमुळे मुंबईला परतल्याचं म्हटलं जात आहे. विराटने अचानक टीम इंडियाची साथ सोडून मुंबईला का परतला, विराटला नक्की काही झालंय का, हे आणि असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहे. विराटने नक्की मुंबईला का परतलाय, हे आपण जाणून घेऊयात.

नक्की कारण काय?

टीम इंडियाचा पहिला सराव सामना हा गुवाहाटीत होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाचे इतर खेळाडू हे गुवाहाटीवरुन तिरुवनंतपुरमच्या प्रवासाला निघाले. तर विराट काही तिरुवनंतपुरमला गेला नाही. विराटने टीम मॅनेजमेंटची परवानगी घेतली. विराट परवानगी मिळाल्यानंतर गुवाहाटीवरुन थेट मुंबईला रवाना झाला. विराटने वैयक्तिक कारणामुळे मुंबईला परतला आहे. मात्र विराट सोमवारी संध्याकाळपर्यंत तिरुवनंतरपुरम इथे पोहचून टीम इंडियासोबत जोडला जाईल, अशी माहिती क्रिकबझच्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.

तिरुवनंतरपुरममध्ये हवामान कसं असेल?

वेदरकॉमनुसार, मंगळवारी 3 ऑक्टोबर रोजी तिरुवनंतपुरममध्ये कमाल तापमान हे 29 डिग्री तर किमान 24 डिग्री सेल्सियस इतकं असेल. या सामन्यादरम्यान पाऊस होण्याची 90 टक्के शक्यता आहे. तसेच ढगाळ वातावरण असेल. त्यामुळे या सामन्यावर पावसाचं सावट आहे.

आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या FDAच्या कारवाईवर फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया,
तुकाराम मुंढेंच्या FDAच्या कारवाईवर फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
KDMC मध्ये अजब प्रकार! पालिका कर्मचाऱ्याचा मराठी बोलण्यास स्पष्ट नकार,
KDMC मध्ये अजब प्रकार! पालिका कर्मचाऱ्याचा मराठी बोलण्यास स्पष्ट नकार, चक्क... धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी..
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी; थेट...
नाही नाही म्हणत असले तरी फडणवीसांना दिल्लीत... बड्या नेत्याचं विधान
नाही नाही म्हणत असले तरी फडणवीसांना दिल्लीत... पुन्हा बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री?
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री? मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीत...
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना सूचना
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना महत्त्वाच्या सूचना... मोठी अपडेट समोर
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल: