AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Champions Trophy 2025 : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतल्यास कोणत्या संघाला मिळणार संधी? जाणून घ्या

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा अवघ्या सात महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. पण ही स्पर्धा पाकिस्तानात होत असल्याने भारतीय संघ खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. जर भारताने न जाण्याचा निर्णय घेतला तर आयसीसी कोणत्या संघाला संधी देणार ते जाणून घ्या.

Champions Trophy 2025 : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतल्यास कोणत्या संघाला मिळणार संधी? जाणून घ्या
| Updated on: Jul 11, 2024 | 2:40 PM
Share

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचे सर्वांनाच वेध लागले आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाकडून जोरदार तयारी सुरू आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली आणि रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडिया या स्पर्धेत उतरणार आहे. जय शाह यांनी रोहित शर्मा या स्पर्धेत कर्णधार असेल हे स्पष्ट केलं आहे. पण सर्वात मोठी अडचण अशी आहे की ही स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. पाकिस्तानकडून वारंवार होणारी दहशतवादी कृत्य पाहून भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडून टाकले आहेत. त्यामुळे भारतीय संघ ना पाकिस्तानात जात आणि ना पाकिस्तान संघाला मायदेशी खेळण्यासाठी बोलवत. असं असताना भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार की नाही हा प्रश्न आहे. आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ हायब्रिड मॉडेलवर खेळला होता. तेव्हा भारताचे सर्व सामने श्रीलंकेत झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर काहीतरी तोडगा निघेल अशी क्रीडाप्रेमींना अपेक्षा आहे. पण ही स्पर्धा पाकिस्तानातच झाली आणि भारतीय संघाने खेळण्यास नकार दिला तर पुढचं गणित कसं असेल? जाणून घेऊयात.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रिड मॉडेलवर स्पर्धा करण्यास नकार दिला तर मात्र टीम इंडिया या स्पर्धेतून बाहेर पडू शकते. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतली तर वेळापत्रकात उलथापालथ होईल. यासाठी आयसीसीला आठव्या संघाचा बंदोबस्त करावा लागेल. आयसीसी यासाठी श्रीलंकेला स्पर्धेत संधी देऊ शकते. त्यामुळे आठ संघ होतील आणि पुढचा प्रश्नच उरणार आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत टॉप 8 संघांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एन्ट्री मिळाली आहे. सध्या यात श्रीलंकन संघ नाही.

भारताने माघार घेतल्यानंतर आयसीसीकडे श्रीलंकेचा पर्याय उरणार आहे. कारण गुणतालिकेत श्रीलंकनं संघ नवव्या स्थानावर आहे. प्रारुप वेळपत्रकात भारताऐवजी श्रीलंकन संघ येईल. तसेच भारताचे सामने ज्या दिवशी आयोजित केले आहेत. तिथे श्रीलंकेला संधी दिली जाईल. म्हणजेच अ गटात पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि न्यूझीलंड हे संघ राहतील. प्रारुप वेळापत्रकानुसार 19 फ्रेबुवारीपासून स्पर्धेला सुरुवात होईल. तसेच 9 मार्चला अंतिम सामना असणार आहे. तसेच 10 मार्च हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

Follow Us
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण
80 लाख लाडक्या बहिणींचा मुद्दा तापला! अदिती तटकरेंचं मोठं स्पष्टीकरण.
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत
सुनेत्रा पवारांच्या निर्णयावर प्रचंड नाराजी, विषय थेट राजीनाम्यापर्यंत.
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं
कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं.
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम..
सुनेत्रा पवारांचा सर्वात मोठा निर्णय! अनेकांच्या विरोधानंतरही विक्रम...
नागपूर विधान परिषदेसाठी अतुल लोंढेंची वर्णी?; उमेदवारी जवळपास निश्चित!
नागपूर विधान परिषदेसाठी अतुल लोंढेंची वर्णी?; उमेदवारी जवळपास निश्चित!.
मोठी बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतींनी विक्रमी टप्पा गाठला, जागतिक...
मोठी बातमी! कच्च्या तेलाच्या किंमतींनी विक्रमी टप्पा गाठला, जागतिक....
एकच खळबळ अन् धुराचा कल्लोळ, नवी दिल्लीतील शिक्षण मंत्रालयाच्या इमारतील
एकच खळबळ अन् धुराचा कल्लोळ, नवी दिल्लीतील शिक्षण मंत्रालयाच्या इमारतील.
अखेर पुन्हा लाल झेंडा फडकला! सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर RCB चा कब्जा
अखेर पुन्हा लाल झेंडा फडकला! सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर RCB चा कब्जा.
त्या पुराण पुरुषांच्या यादीत लखानी अग्रस्थानी; सुप्रिया सुळेंच्या...
त्या पुराण पुरुषांच्या यादीत लखानी अग्रस्थानी; सुप्रिया सुळेंच्या....
भाऊ खुर्चीवर, बहीण वाऱ्यावर! 80 लाख महिलांचा श्राप महायुतीला लागणार?
भाऊ खुर्चीवर, बहीण वाऱ्यावर! 80 लाख महिलांचा श्राप महायुतीला लागणार?.