AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs IND: हातातला सामना जिंकण्यात अपयश! रोहितने काय म्हटलं?

Rohit Sharma SL vs IND 1st Odi: कॅप्टन रोहित शर्मा याने 56 धावा करुनही भारताला 231 धावा करण्यात अपयश आलं. सामना बरोबरीत सुटल्यांनतर रोहितने काय म्हटलं?

SL vs IND: हातातला सामना जिंकण्यात अपयश! रोहितने काय म्हटलं?
rohit sharma
| Updated on: Aug 02, 2024 | 11:27 PM
Share

सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंकेला टी 20 मालिकेत 3-0 अशा फरकाने क्लीन स्वीप दिला. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात श्रीलंकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना हा टाय झाला आहे. टीम इंडियाला श्रीलंकेने विजयासाठी 231 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा याने 56 धावा करुनही भारताला हा सामना जिंकता आला नाही. टीम इंडियाला विजयासाठी 15 बॉलमध्ये हातात 2 विकेट्स असतानाही 1 धाव करता आली नाही. श्रीलंकेचा कॅप्टन चरिथ असलांका याने 48 व्या ओव्हरमधील चौथ्या आणि पाचव्या बॉलवर 2 विकेट्स घेत टीम इंडियाला जिंकण्यापासून रोखलं. असालंका याने शिवम दुबे आणि त्यानंतर अर्शदीप सिंह या दोघांना बाद करत टीम इंडियाचं 47.5 ओव्हरमध्ये 230 धावांवर पॅकअप केलं. सामना अशाप्रकारे बरोबरीत सुटला. या सामन्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा खूप काही बोलला.

रोहितने काय म्हटलं?

“आव्हान पूर्ण करण्यासारखं होतं. मात्र टार्गेट पूर्ण करण्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. आम्ही काही टप्प्यांमध्ये चांगले खेळलो, मात्र त्यात गती नव्हती. बॅटिंगने आम्ही चांगली सुरुवात केली. मात्र 10 ओव्हरनंतर फिरकी गोलंदाजांना मदत होईल हे माहित होतं. आम्ही आधी वरचढ होतो, मात्र पहिल्या 2 विकेट्स गमावल्यानंतर आम्ही मागे पडलो. त्यानतंर केएल राहुल आणि अक्षर पटेल या जोडीने केलेल्या भागीदारीमुळे आम्ही कमबॅक केलं. मात्र शेवटी निराशा झाली. 14 बॉलमध्ये 1 धाव करता आली नाही. मात्र या गोष्टी घडतात”, असं रोहितने म्हटलं. केएल आणि अक्षर या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 57 धावांची भागदारी केली होती. त्यामुळे भारताच्या विजयाचा आशा कायम होत्या.

श्रीलंकेचं कौतुक आणि खंत

श्रीलंकेच्या कामगिरीचं कौतुक करत टीम इंडियाच्या लढाईचा अभिमान वाटतो, असं रोहितने म्हटलं. “श्रीलंका चांगला खेळला. आम्ही शेवटपर्यंत ज्या प्रकारे लढलो त्याचा अभिमान वाटतो. सामना जिंकण्याची संधी दोघांना होती. मात्र सामन्यात कायम राहणं महत्त्वाचं होतं. ती एक धाव आम्हाला मिळायला हवी होती”, असं म्हणत रोहितने खंत व्यक्त केली.

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन: चारिथ असालंका (कॅप्टन), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटीकपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालगे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो आणि मोहम्मद शिराज.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.