AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs CSK IPL Final : अंतिम सामन्यात केकेआरला एका गोष्टीचा फटका नक्कीच बसणार, दिग्गज गोलंदाज डेल स्टनने व्यक्त केलं मत

आयपीएलच्या 14 व्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स हे दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत. शुक्रवारी (15 ऑक्टोबर) हा भव्य सामना पार पडणार आहे.

KKR vs CSK IPL Final : अंतिम सामन्यात केकेआरला एका गोष्टीचा फटका नक्कीच बसणार, दिग्गज गोलंदाज डेल स्टनने व्यक्त केलं मत
डेल स्टेन
| Edited By: | Updated on: Oct 14, 2021 | 9:08 PM
Share

IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या पर्वाच्या अंतिम सामन्याला केवळ एक दिवस शिल्लक आहे. शुक्रवारी (15 ऑक्टोबर) केकेआर आणि सीएसके (KKR vs CSK) यांच्यात दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर हा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याची विशेष गोष्ट म्हणजे एका वेळी गुणतालिकेत अगदी खालच्या स्थानांमध्ये असणाऱ्या केकेआरने अंतिम सामन्यांपर्यंच मारलेली धडक आणि धोनीच्या चेन्नईने काय ठेवलेला क्लास. दोघांच्यतील या सामन्याबद्दल दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज गोलंदाज डेल स्टेनने (Dale Steyn) त्याचं मत समोर आणलं आहे. त्याच्या मते चेन्नईचा संघ त्यांच्या चांगल्या फॉर्ममुळे सामन्यात सरस ठरेल. तर केकेआर संघाला एका गोष्टीचा तोटा होऊ शकतो.

स्टेनच्या मते केकेआर संघाला त्यांचा कर्णधार इयॉन मॉर्गन आणि वरिष्ठ खेळाडू दिनेश कार्तिक यांचा खराब फॉर्म याचा सर्वाधिक धोका असून यामुळे त्यांना अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागू शकतो. स्टेनने  ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “उद्याचा सामना अगदी चुरशीचा होणार हे नक्की! इथवर पोहोचलेले्या केकेआरला त्यांच्या कर्णधाराचे काही चूकीचे निर्णय आणि खराब फॉर्म याचा फटका अंतिम सामन्यात पोहचू शकतो. तसचं चेन्नईचा संघ उत्तम फॉर्ममध्ये आहे. पहिल्या क्वॉलीफायर सामन्यात त्यांनी ज्याप्रकारे दिल्लीला पराभूत केलं त्यानुसार ते सामना जिंकण्याची अधिक शक्यता आहे.”

चेन्नईला त्रिकुटाचा धोका

उद्याच्या सामन्यात चेन्नईचं पारडं जड असलं तरी केकेआरचे तीन खेळाडू चेन्नसाठी फार धोकादायक आहेत. हे त्रिकुट म्हणजे सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती आणि शाकिब अल् हसन. या तिघा फिरकीपटूंनी आतापर्यंत आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे भारताचा युवा गोलंदाद वरुण यानेतर सर्वात बेस्ट फिरकी गोलंदाजी यंदाच्या पर्वात केली आहे. त्याच जोरावर त्याची आगामी टी20 विश्व चषकासाठीही निवड झाली आहे. तिघांच्या इकॉनोमीचा विचार करता वरुणची इकॉनोमी सर्वात कमी म्हणजे 6.40, त्यानंतर सुनीलची 6.44 आणि अखेर शाकिबची इकॉनोमी 6.64 इतकी आहे. दरम्यान टी20 प्रकारात 7 पेक्षा कमी इकॉनोमी म्हणजे उत्कृष्ट असल्याने सीएसकेची डोकेदुखी वाढली आहे.

हे ही वाचा

मोठी बातमी: T20 World Cup 2021 नंतर विराट आणि रोहित संघाबाहेर, युवा खेळाडूंना मिळणार संधी

KKR vs CSK IPL Final: चेन्नई सुपरकिंग्सच्या मनात केकेआरच्या ‘त्रिकुटा’ची भिती, धोनीच्या चिंतेतही वाढ

T20 World Cup मधल्या सिक्सर किंग्सची यादी, टॉप 5 मध्ये भारताचा एकमेव खेळाडू

(In KKR vs CSK IPL Final KKR May Loose due to morgans bad captaincy says dale steyn)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.