AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: T20 World Cup 2021 नंतर विराट आणि रोहित संघाबाहेर, युवा खेळाडूंना मिळणार संधी

इकडे 14 नोव्हेंबरला T20 वर्ल्ड कप स्पर्धेचा विजेता घोषित होईल आणि दुसरीकडे भारतीय क्रिकेट मातृभूमीत विविध अशा चार संघाशी सामने खेळायला सुरुवात करेल. याची सुरुवात न्यूझीलंड सोबत होणार आहे.

मोठी बातमी: T20 World Cup 2021 नंतर विराट आणि रोहित संघाबाहेर, युवा खेळाडूंना मिळणार संधी
रोहित शर्मा आणि विराट कोहली
| Edited By: | Updated on: Oct 14, 2021 | 6:01 PM
Share

मुंबई:  बहुप्रतिक्षित T20 वर्ल्ड कपला (ICC T20 World Cup) काही दिवसांत सुरुवात होणार आहे. या भव्य स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे गही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघ पुढील वेळापत्रकही समोर आलं आहे. भारतीय संघ विविध अशा चार देशांना भारतात खेळण्यासाठी घेऊन येणार आहे. दरम्यान यावेळी न्यूझीलंडचा दौैरा सर्वात पहिला असून यादरम्यान टी20 सामन्यांवेळी रोहित शर्मा, विराट यांच्यासह वरीष्ठ खेळाडूंना विश्रांती म्हणून संघाबाहेर ठेवलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

विश्वचषकाची फायनल 14 नोव्हेंबर रोजी आहे. त्यानंतर 17 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड संघाच्या दौऱ्याची सुरुवात होईल. या दौऱ्यात 3 टी20 सामन्यांसह 2 कसोटी सामनेही खेळवले जाणार आहे. दरम्यान कसोटी सामने हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. ज्यामुळे आधी होणाऱ्या टी20 मालिकेवेळी भारताच्या दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली जाणार आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यासारखी नावं आहेत.

न्यूझीलंडविरुद्ध युवा खेळाडूंना संधी

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ‘अधिक भारतीय खेळाडू विशेषत: वरिष्ठ खेळाडू हे मागील बरेच महिने विविध दौऱ्यांमुळे सतत बायोबबलमध्ये आहेत. त्यामुळे टी20 वर्ल्ड कपनंतर त्यांना काहीशी विश्रांती देण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यातील टी20 सामन्यात त्यांना संघाबाहेर ठेवले जाणार आहे. यामध्ये कोहली, बुमराह, शर्मा आणि शमी यांची नाव असतील. यावेळी ऋतुराज गायकवाड, हर्षल पटेल, आवेश खान आणि व्यंकटेश अय्यर या युवा खेळाडूंना संधी दिली जाईल.

द्रविडकडे पुन्हा हेड कोचची जबाबदारी

श्रीलंका दौऱ्यावर भारताचा मुख्य प्रशिक्षक असणारा राहुल द्रविड याला आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांसाठीही हेड कोच केलं जाऊ शकतं. टी20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक पद सोडणार आहेत. तोवर दुसरा प्रशिक्षक नेमणार की नाही हे अद्याप माहित नसल्याने त्यावेळी राहुललाच ही जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

न्यूझीलंड संघाचा भारत दौरा

17 नोव्हेंबर रोजी या दौऱ्याची सुरुवात होईल. यावेळी पहिला T20 सामना जयपुरमध्ये, दुसरा T20 सामना 19 नोव्हेंबरला रांचीमध्ये आणि तिसरा आणि शेवटचा T20 सामना 21 नोव्हेंबरला कोलकाता येथे खेळवला जाईल. T20 मालिकेनंतर कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिली कसोटी 25 नोव्हेंबर ते  29 नोव्हेंबर दरम्यान कानपुरच्या ग्रीन पार्क येथे खेळवली जाईल. त्यानंतर दुसरी टेस्ट मॅच 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर या काळात मुंबच्ईया वानखेड़े मैदानात खेळवली जाईल.

इतर बातम्या

KKR फायनलमध्ये पण दिनेश कार्तिकला शिक्षा, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी, IPL ने फटकारले

IPL 2021: दिल्लीविरुद्ध केकेआर सामन्यात पाहायला मिळालं अजब दृश्य, तंबूत परतलेल्या शिमरॉनला पंचानी पुन्हा बोलवलं, नेमकं काय घडलं?

1 झेल 3 खेळाडू तरीही अपयश, LIVE सामन्यातील हा VIDEO पाहाच!

(After T20 World Cup Virat kohli rohit sharma and senior players will rest and young players will play in t20 home series against new zealand)

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.