AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND A vs SL A : श्रीलंकेच्या हातात असलेला सामना 48 आणि 49 व्या षटकात फिरला, काय झालं ते जाणून घ्या

तिरंगी मालिकेतील पहिला सामना भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात पार पडला. हा सामना भारताने 8 धावांनी जिंकला. खरं तर हा सामना श्रीलंकेच्या पारड्यात होता. पण 48 आणि 49 व्या षटकात श्रीलंकेचं गणित चुकलं आणि भारताने विजय मिळवला.

IND A vs SL A : श्रीलंकेच्या हातात असलेला सामना 48 आणि 49 व्या षटकात फिरला, काय झालं ते जाणून घ्या
IND A vs SL A : श्रीलंकेच्या हातात असलेला सामना 48 आणि 49 व्या षटकात फिरला, काय झालं ते जाणून घ्याImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jun 09, 2026 | 7:20 PM
Share

तिरंगी मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारत अ आणि श्रीलंका अ संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताची सुरूवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 16 धावांवर दोन विकेट पडल्या होत्या. पण ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्माच्या खेळीमुळे 250 पार धावा झाल्या. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 277 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान श्रीलंका सहज गाठेल असंच वाटलं होतं. कारण पहिल्या विकेटसाठी टीम इंडियाला खूपच घाम गाळावा लागला. भारताला पहिली विकेट 93 धावांवर मिळाली. त्यानंतर मधल्या टप्प्यात विकेट मिळाल्या, पण सामना श्रीलंकेच्या पारड्यात झुकला होता. श्रीलंकेच्या 260 धावांवर 6 विकेट गेल्या होत्या. 18 चेंडूत 17 धावांची गरज होती. पण 48 आणि 49व्या षटकात भारताने पकड मजबूत करून हातातून गेलेला सामना खेचून आणला.

काय झालं 48व्या षटकात?

भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्माने 48वं षटक अंशुल कंबोजच्या हाती दिलं. वानुजा सहान आणि सहान अराच्चिगे या दोघांची जोडी जमली होती. या जोडीने 25 धावांची भागीदारी केली होती. तसेच सहान अराच्चिगे 74 धावांवर खेळत होता. त्यामुळे ही जोडी फोडणं आणि अराच्चिगेला बाद करण्याचं आव्हान होतं. स्ट्राईकला वानुजा होता आणि त्याने एक धाव काढून अराच्चिगेला स्ट्राईक दिली. दुसऱ्या चेंडूवर अंशुलने त्याचा त्रिफळा उडवला. व्ही वियासकांतला मैदानात आला आणि या षटकातील शेवटच्या चार चेंडूवर 6 धावा आल्या. त्यामुळे 12 चेंडूत 10 धावा आणि तीन विकेट हातात अशी स्थिती आली.

काय झालं 49व्या षटकात?

तिलक वर्माने 49वं षटक अर्शद खानच्या हाती सोपवलं. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर वानुजा सहानने 1 धाव काढली आणि व्ही. वियासकांतला स्ट्राईक दिली. त्याला एलबीडब्ल्यू करण्यात अर्शद खानला यश आलं. त्यानंतर मोहम्मद शिराज मैदानात उतरला आणि पहिल्याच चेंडूवर अर्शद खानच्या डोक्यावरून मारला. वानुजा एक धाव घेण्यासाठी धावला पण ऋतुराजने हा चेंडू पकडला आणि त्याला धावचीत केलं. त्यामुळे हा सामना भारताच्या पारड्यात झुकला. श्रीलंकेला विजयासाठी 9 चेंडूत 9 धावांची गरज होती. मोहम्मद शिराज स्ट्राईकला होता आणि चौथा चेंडू निर्धाव गेला. पाचव्या चेंडूवर फटका मारताना चुकला आणि विप्रज निगमने त्याचा झेल पकडला. हा सामना भारताने 8 धावांनी जिंकला.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष