AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDA vs SLA : टीम इंडियाची कमाल, श्रीलंकेच्या तोंडातून हिसकावला विजयाचा घास, 8 धावांनी मात

Sri Lanka A vs India A Match Result : भारतीय गोलंदाजांनी श्रीलंका ए विरुद्ध यशस्वीपणे 277 धावांचा बचाव केला. भारताने हा सामना 8 धावांनी जिंकत श्रीलंका दौऱ्याची सुरुवात विजयाने केली.

INDA vs SLA : टीम इंडियाची कमाल, श्रीलंकेच्या तोंडातून हिसकावला विजयाचा घास, 8 धावांनी मात
Vaibhav Sooryavanshi and India A TeamImage Credit source: Sri Lanka Cricket Via Bcci X Account
| Updated on: Jun 09, 2026 | 7:25 PM
Share

तिलक वर्मा याच्या नेतृत्वात इंडिया ए टीमने ट्राय सीरिजमध्ये विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने मालिकेतील सलामीच्या सामन्यात यजमान श्रीलंका ए वर 8 धावांनी मात केली. भारताने श्रीलंकेसमोर 278 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंका जोरदार लढत देत धावांच्या जवळ येऊन पोहचली. त्यामुळे श्रीलंका जिंकेल असंच चित्र होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या क्षणी कमाल केली आणि सामना जिंकला. श्रीलंकेचा स्कोअर 47 ओव्हरमध्ये 6 आऊट 261 असा होता. त्यामुळे श्रीलंकेला 18 बॉलमध्ये 17 रन्सची गरज होती. त्यामुळे श्रीलंका सहज जिंकेल असं वाटत होतं. मात्र भारताने यशस्वीपणे धावांचा बचाव केला. भारताने श्रीलंकेला 7 धावांच्या मोबदल्यात 4 झटके देत ऑलआऊट केलं आणि तोंडातून विजयाचा घास हिसकावला. ऋतुराज गायकवाड भारताच्या विजयाचा हिरो ठरला.

सामन्यात काय घडलं?

भारताच्या बाजून नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार तिलक वर्मा याने बॅटिंगचा निर्णय घेतला. भारताने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 277 धावांपर्यंत मजल मारली. मिडल ऑर्डरमधील ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा या दोघांनी भारताला 270 पार पोहचवण्यात प्रमुख योगदान दिलं. ऋतुराजने 114 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 6 फोरसह 101 रन्स केल्या. तर तिलकने 97 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 60 धावा केल्या. तसेच प्रियांश आर्या याने 32 रन्स केल्या. आयुष बडोनी याने 24 रन्स केल्या. तर सूर्यांश शेडगे याने अखेरच्या क्षणी नाबाद आणि निर्णायक 26 धावांचं योगदान दिलं. वैभव सूर्यवंशी याच्याकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र वैभव 14 धावा करुन बाद झाला. तर श्रीलंकेसाठी मोहम्मद शिराज याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या.

अखेरच्या क्षणी भारताचं कमबॅक आणि सामना जिंकला

श्रीलंकेने 278 धावांचा पाठलाग करताना 47 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 261 रन्स केल्या होत्या. तर कर्णधार सहान अरचिगे हा 74 धावांवर नाबाद खेळत होता. श्रीलंकेला विजयासाठी शेवटच्या 18 बॉलमध्ये फक्त 17 रन्सची गरज होती. श्रीलंकेचा विजयाच्या दिशेने प्रवास सुरु होता. मात्र अंशुल कंबोज याने 48 व्या ओव्हरमध्ये कमाल केली. अंशुलने सेट झालेल्या सहानला आऊट केलं. सहान आऊट झाल्याने सामना भारताच्या बाजूने झुकला. भारताने श्रीलंकेला 7 धावांच्या मोबदल्यात 4 झटके दिले आणि 48. 5 ओव्हरमध्ये 269 रन्सवर ऑलआऊट करत सामना जिंकला.

श्रीलंकेसाठी सहानने सर्वाधिक धावा केल्या. सहानने 72 बॉलमध्ये 74 रन्स केल्या. निरोशन डिकवेला याने 47 धावांचं योगदान दिलं. सदीरा समरविक्रमा याने 46 आणि अविष्का फर्नांडो याने 45 धावा जोडल्या. मात्र अखेरच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. अर्शद खान, अनुकूल रॉय, विपराज निगम आणि आयुष बडोनी या चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर अंशुल कंबोज याने 1 मात्र निर्णायक विकेट मिळवली.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष