AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG : भारताचा वनडे मालिकेत अफगाणिस्तानला व्हाईट वॉश, तिसऱ्या सामन्यात 9 विकेटने नमवलं

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. ही मालिका भारताने 3-0 ने जिंकली. तिसऱ्या वनडे मालिकेत भारताने 9 गडी राखून विजय मिळवला.

IND vs AFG : भारताचा वनडे मालिकेत अफगाणिस्तानला व्हाईट वॉश, तिसऱ्या सामन्यात 9 विकेटने नमवलं
IND vs AFG : भारताचा वनडे मालिकेत अफगाणिस्तानला व्हाईट वॉश, तिसऱ्या सामन्यात नमवलंImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jun 20, 2026 | 7:59 PM
Share

भारताने अफगाणिस्तानला तिसऱ्या वनडे सामन्यात 9 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात अफगाणिस्तानने भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 1 गडी गमवून पूर्ण केलं. 22.4 षटकात हे आव्हान पूर्ण करत अफगाणिस्तानला लोळवलं. या विजयासह भारताने अफगाणिस्तानला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 ने मात देत व्हाईट वॉश दिला. कसोटी सामन्यानंतर भारताने वनडे मालिकेत अफगाणिस्तानला मात दिली आहे. विजयी धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी आक्रमक पण सावध सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 170 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने 69 चेंडूनत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 79 धावा केल्या. त्यामुळे सामना पूर्णपणे भारताच्या पारड्यात झुकला आणि त्याचा निकालही तसाच लागला. यशस्वी जयस्वालने या सामन्यात 83 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याने षटकार मारून शतक पूर्ण केलं. या आधीच्या सामन्यात फक्त 4 धावा करून बाद झाला होता. पण त्याची पूर्ण भरपाई या सामन्यात केली.

भारताने गोलंदाजी कशी कामगिरी केली?

भारताकडून गोलंदाजीत प्रसिद्ध कृष्णाने भेदक गोलंदाजी केली. त्याने 8.2 षटकात 23 धावा देत 5 गडी बाद केले. यात 2 षटकं निर्धाव टाकली. तर गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी एक विकेट काढली. तसेच दोन विकेट धावचीत स्वरूपात मिळाले. अफगाणिस्ताकडून हशमतुल्लाह शाहिदी आणि अझमतुल्लाह ओमरझाई वगळता एकही फलंदाज मोठी कामगिरी करू शकला नाही. हशमतुल्लाहने 131 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकार मारत 102 धावा केल्या. तर अझमतुल्लाह ओमरझाईने 56 चेंडूत 50 धावांची खेळी केली.

मालिकेत काय घडलं?

भारत अफगाणिस्तान पहिल्या सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे हा सामना 25 षटकांचा झाला होता. या सामन्यात अफगाणिस्तानने 194 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 22.5 षटकात 7 विकेट राखून पूर्ण केलं होतं.. तर दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने 402 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे आव्हान गाठताना अफगाणिस्तानचा संघ 232 धावा करू शकला. हा सामना अफगाणिस्तानने 170 धावांनी जिंकला.

Follow Us
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं