AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : श्रेयस अय्यर रन आऊट झाला तेव्हा नेमकी चूक कोणाची? रैना आणि मिश्रा यांनी स्पष्टच सांगितलं..

IND vs AUS : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या दृष्टीकोनातून श्रेयस अय्यरकडे पाहिलं जात आहे. मधल्या फळीत चांगली फलंदाजी करेल या हेतूने त्याचं कमबॅक झालं आहे. पण त्याला अजूनही स्वत:ला सिद्ध करता आलेलं नाही.

IND vs AUS : श्रेयस अय्यर रन आऊट झाला तेव्हा नेमकी चूक कोणाची? रैना आणि मिश्रा यांनी स्पष्टच सांगितलं..
IND vs AUS : श्रेयस अय्यर कोणाच्या चुकीमुळे रन आऊट झाला? रैना आणि मिश्रा म्हणाले...Image Credit source: Twitter
| Updated on: Sep 22, 2023 | 10:10 PM
Share

मुंबई : भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्या वनडे सामन्यात 5 गडी राखून पराभूत केलं. टॉस जिंकल्यानंतर कर्णधार केएल राहुल याने गोलंदाजीचा निर्णय घेतला.तसेच ऑस्ट्रेलियाला 276 धावांवर रोखण्यात टीम इंडियाला यश आलं. भारताने हे आव्हान 48.4 षटकात पाच गडी गमवून पूर्ण केलं. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात श्रेयस अय्यरकडून अपेक्षा होत्या. मात्र रनआऊट झाल्याने त्याला या सामन्यातही सिद्ध करता आलं नाही. श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल यांच्यात एका धावेसाठी गडबड झाली आणि श्रेयसला तंबूत जावं लागलं. पण यावेळी नेमकी चूक कोणाची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

श्रेयस अय्यर रन आऊट झाला, चूक कोणाची?

शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी 142 धावांची भागीदारी केली. जोखिम घेत फटका मारताना ऋतुराज बाद होत तंबूत परतला. त्यानंतर मैदानात श्रेयर अय्यर आला. त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र 25 व्या षटकात एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू मारला आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न फसला.

नॉन स्ट्राईकला उभ्या असलेल्या शुबमन गिलनेही क्रीज सोडली. पण अर्ध्या रस्त्यात असताना त्याने अय्यरला मागे परतण्यास सांगितलं. पण तिथपर्यंत खूपच उशीर झाला होता. कॅमरोन ग्रीनने विकेटकीपरकडे थ्रो केला आणि अय्यर धावचीत झाला. बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर प्रचंड नाराज दिसला. त्यामुळे नेमकी कोणाची असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सामन्याचं समालोचन करत असलेले अमित मिश्रा आणि सुरेश रैना यांना याबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा दोघांनी सांगितलं की, श्रेयस अय्यरने जोखिम घ्यायला नको होती. मिश्राने सांगितलं की, श्रेयस अय्यर चेंडू मारताच धावू लागला, त्यामुळे गिलला हा की नको सांगण्याची संधीच मिळाली नाही. रैनाने देखील त्याला समर्थन देत सांगितलं की, “रिस्की धाव घेण्याची गरज नव्हती. नॉन स्ट्राईकला उभ्या असलेल्या गिलसोबत संवाद साधणही तितकंच महत्त्वाचं होतं.”

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत