AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS Test : दोन मोठ्या कारणांमुळे शेवटच्या क्षणी टीम इंडियाच दिल्लीतील हॉटेल बदललं

IND vs AUS Test : अखेरच्या क्षणी टीम इंडियाच दिल्लीत मुक्कामच हॉटेल बदलण्यात आलय. यावेळी टीम इंडिया दिल्लीत दुसऱ्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे. टीम इंडियाच दिल्लीतील हॉटेल का बदलण्यात आलं? त्यामागे दोन कारणं आहेत.

IND vs AUS Test : दोन मोठ्या कारणांमुळे शेवटच्या क्षणी टीम इंडियाच दिल्लीतील हॉटेल बदललं
ind vs aus 2nd testImage Credit source: you tube
| Updated on: Feb 16, 2023 | 11:57 AM
Share

IND vs AUS Test : बॉर्डर-गावस्कर सीरीजमधील दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी टीम इंडिया दिल्लीत दाखल झालीय. दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. नागपूरमधील पहिला कसोटी सामना जिंकून टीम इंडियाने 4 टेस्ट मॅचच्या सीरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय टीमला दिल्ली कसोटीत ही आघाडी वाढवून 2-0 करायची आहे. त्यांची तयारी जोरात सुरु आहे. यावेळी अखेरच्या क्षणी टीम इंडियाच दिल्लीत मुक्कामच हॉटेल बदलण्यात आलय. यावेळी टीम इंडिया दिल्लीत दुसऱ्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे. टीम इंडियाच दिल्लीतील हॉटेल का बदलण्यात आलं? त्यामागे दोन कारणं आहेत.

नेहमी टीम इंडिया कुठल्या हॉटेलमध्ये उतरते?

टीम इंडियात दिल्लीत सामना खेळण्यासाठी येते, तेव्हा त्यांच्यासाठी ITC मौर्या आणि ताज पॅलेस हॉटेलची बुकिंग केली जाते. पण PTI च्या वृत्तानुसार, टीम इंडिया यावेळी या दोन्ही पैकी कुठल्याही हॉटेलमध्ये थांबली नाहीय.

टीम इंडियाच हॉटेल का बदललं?

PTI नुसार, यावेळी नोएडाच्या हॉटेल लीलामध्ये टीम इंडियाच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आलीय. दोन कारणांमुळे टीम इंडियाच हॉटेल बदलण्यात आलय. पहिलं कारण आहे, G20 संम्मेलन आणि दुसरं दिल्लीतील लग्नाचा सीजन. दिल्लीत ताज पॅलेस आणि ITC मौर्या दोन्ही हॉटेल्सवर मोठा लोड आहे. दोन्ही हॉटेल्समधील बहुतांश रुम्स बुक आहेत. त्यामुळे यावेळी टीम इंडियाच हॉटेल बदलण्यात आलय. विराट टीमसोबत नव्हता

हॉटेल लीलामध्येही चांगल्या सुविधा देण्यात आल्या आहेत. पर्याय नसल्यामुळे यावेळी दुसऱ्या हॉटेलची निवड करण्यात आली, असं बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितलं. विराट कोहली टीमसोबत हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबला नाहीय. विराट कोहली मूळचा दिल्लीचा आहे. तो गुरुग्राम येथील आपल्या घरी थांबलाय. आज विराट कोहली हॉटेलमध्ये चेक इन करु शकतो. विराटने घरी थांबण्यासाठी टीम मॅनेजमेंटकडून स्पेशल परवानगी घेतली होती.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.