AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup: टीम इंडियाला झटका, ‘हा’ प्रमुख खेळाडू बांग्लादेश विरुद्ध नाही खेळणार

T20 World Cup: वर्ल्ड कप सुरु असताना टीम इंडियाला आणखी एक धक्का

T20 World Cup: टीम इंडियाला झटका, 'हा' प्रमुख खेळाडू बांग्लादेश विरुद्ध नाही खेळणार
Team India Image Credit source: BCCI
| Updated on: Oct 31, 2022 | 12:18 PM
Share

पर्थ: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला झटका बसला आहे. कालच दक्षिण आफ्रिकेकडून टीम इंडियाचा वर्ल्ड कपमध्ये पहिला पराभव झाला. सेमीफायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला पुढचे सामने जिंकण आवश्यक आहे. मात्र त्याआधी टीमला एक झटका बसला आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना बांग्लादेश विरुद्ध होणार आहे. एडलेडमध्ये ही मॅच होईल.

य दुखापत झालीय?

या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवणं आवश्यक आहे. या मॅचमध्ये दिनेश कार्तिक खेळणार नाहीय. त्याच्या लोअर बॅकला दुखापत झालीय. त्याच्याजागी विकेटकीपर ऋषभ पंतच खेळणं निश्चित आहे. काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना दिनेश कार्तिकला दुखापत झाली होती.

ऋषभ पहिल्यांदा मैदानात उतरला

रविवारी सामना सुरु असताना दिनेश कार्तिकने दुखापतीमुळे मैदान सोडलं. त्याच्याजागी ऋषभ पंत विकेटकिपींगसाठी मैदानात उतरला. टी 20 वर्ल्ड कपमध्ये ऋषभने पहिल्यांदा ग्लोव्हज हातात घातले.

बीसीसीआयकडून स्टेटमेंट नाही

“दिनेश कार्तिकला पाठिची समस्या झाली. मॅचनंतर आम्ही भेटलो नाही. हॉटेलवर गेल्यानंतर मी त्याच्याशी बोलीन. फिजियोच्या रिपोर्टची आम्ही वाट पाहतोय” असं भुवनेश्वर कुमार मॅचनंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाला. दिनेश कार्तिकच्या दुखापतीबद्दल अजून बीसीसीआयकडून अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही.

दिनेश कार्तिककडून अपेक्षाभंग

कालच्या सामन्याला टीमला गरज असताना दिनेश कार्तिक बॅटने कमाल दाखवू शकला नाही. त्याने 15 चेंडूत 6 धावा केल्या. सूर्यकुमारसोबत मिळून त्याने डाव सावरला. पण त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा त्याने पूर्ण केल्या नाहीत. कालच्या मॅचमध्ये त्याने 15-20 जास्त केल्या असत्या, तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.

शेवटपर्यंत झुंजवलं

टीम इंडियाने काल पहिली फलंदाजी केली. त्याने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 134 धावांच लक्ष्य दिलं होतं. आफ्रिकेने पाच विकेट राखून विजय मिळवला. पण त्यांना सहजासहजी लक्ष्य गाठता आलं नाही. पर्थच्या विकेटवर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकन टीमला शेवटच्या ओव्हरपर्यंत विजयासाठी झुंजवलं.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.