AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG 2nd Test : बुमराह नाही तर हा खेळाडू होता ‘मॅन ऑफ द मॅच’चा मानकरी, टीम इंडियाचा पराभव होता अटळ

Man of The Match : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह याला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं. पण बुमराहपेक्षा एक असा खेळाडू तो जर खेळला नसता तर टीम इंडियाचा पराभव अटळ होता. कोण आहे तो जाणून घ्या.

IND vs ENG 2nd Test : बुमराह नाही तर हा खेळाडू होता 'मॅन ऑफ द मॅच'चा  मानकरी, टीम इंडियाचा पराभव होता अटळ
| Updated on: Feb 05, 2024 | 6:20 PM
Share

मुंबई : टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंड संघाचा पराभव केला आहे. दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करत इंग्लंडवर 106 धावांनी विजय मिळवलाय. पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये आता टीम इंडियाने या विजयासह 1-1 ने बरोबरी केली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने नऊ विकेट घेतल्या. या प्रदर्शनामुळे बुमराहला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं आहे. मात्र सामनावीर पुरस्काराचा आणखी एक खेळाडू मानकरी होता. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये संघात एक खेळाडू असा होता. ज्याच्या चमकदार प्रदर्शनामुळे टीम इंडियाने इंग्लंड संघाला आव्हान दिलं. नाहीतर टीमचा पराभव हा अटळ होता. हा खेळाडू नेमका कोण असा तुम्हाला प्रश्न पडला असेल? तर तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून जशस्वी जयस्वाल आहे पठ्ठ्याने पहिल्या डावात ठोकलेल्या द्विशतकामुळे टीम इंडियाने मोठं लक्ष्य इंग्लंडसंघासमोर ठेवलं. पहिल्या डावामध्ये तो सोडता इतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही.

यशस्वी जयस्वाल याने 290 बॉलमध्ये 209 धावा केल्या. यामध्ये त्याने 19 चौकार आणि सात षटकार मारले. या खेळीमुळे टीम इंडियाची धावसंख्या 400 पर्यंत पोहोचली होती. कारण दुसरा डाव पाहिला तर जेम्स अँडरसन याने यशस्वीला स्वस्तात माघारी पाठवलं होतं. दुसऱ्या डावात टीम इंडिया अवघ्या 255 धावांवर आऊट झाली होती.  सामना सांघिक कामगिरीने जिंकला असला तरी युवा खेळाडू असल्याने त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात यायला हवं होतं, असं नेटकरी बोलत आहेत.

दरम्यान, पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये टीम इंडियाने 1-1 ने बरोबरी साधली आहे. तिसरा कसोटी सामना राजकोट येथे पार पडणार आहे. हा सामना 15 फेब्रुवारीला होणार असून जो संघ हा सामना जिंकेल तो मालिकेत आघाडी घेणार आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.