AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG 2nd Test : बुमराह नाही तर हा खेळाडू होता ‘मॅन ऑफ द मॅच’चा मानकरी, टीम इंडियाचा पराभव होता अटळ

Man of The Match : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह याला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं. पण बुमराहपेक्षा एक असा खेळाडू तो जर खेळला नसता तर टीम इंडियाचा पराभव अटळ होता. कोण आहे तो जाणून घ्या.

IND vs ENG 2nd Test : बुमराह नाही तर हा खेळाडू होता 'मॅन ऑफ द मॅच'चा  मानकरी, टीम इंडियाचा पराभव होता अटळ
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 05, 2024 | 6:20 PM
Share

मुंबई : टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंड संघाचा पराभव केला आहे. दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करत इंग्लंडवर 106 धावांनी विजय मिळवलाय. पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये आता टीम इंडियाने या विजयासह 1-1 ने बरोबरी केली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने नऊ विकेट घेतल्या. या प्रदर्शनामुळे बुमराहला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं आहे. मात्र सामनावीर पुरस्काराचा आणखी एक खेळाडू मानकरी होता. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये संघात एक खेळाडू असा होता. ज्याच्या चमकदार प्रदर्शनामुळे टीम इंडियाने इंग्लंड संघाला आव्हान दिलं. नाहीतर टीमचा पराभव हा अटळ होता. हा खेळाडू नेमका कोण असा तुम्हाला प्रश्न पडला असेल? तर तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून जशस्वी जयस्वाल आहे पठ्ठ्याने पहिल्या डावात ठोकलेल्या द्विशतकामुळे टीम इंडियाने मोठं लक्ष्य इंग्लंडसंघासमोर ठेवलं. पहिल्या डावामध्ये तो सोडता इतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही.

यशस्वी जयस्वाल याने 290 बॉलमध्ये 209 धावा केल्या. यामध्ये त्याने 19 चौकार आणि सात षटकार मारले. या खेळीमुळे टीम इंडियाची धावसंख्या 400 पर्यंत पोहोचली होती. कारण दुसरा डाव पाहिला तर जेम्स अँडरसन याने यशस्वीला स्वस्तात माघारी पाठवलं होतं. दुसऱ्या डावात टीम इंडिया अवघ्या 255 धावांवर आऊट झाली होती.  सामना सांघिक कामगिरीने जिंकला असला तरी युवा खेळाडू असल्याने त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात यायला हवं होतं, असं नेटकरी बोलत आहेत.

दरम्यान, पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये टीम इंडियाने 1-1 ने बरोबरी साधली आहे. तिसरा कसोटी सामना राजकोट येथे पार पडणार आहे. हा सामना 15 फेब्रुवारीला होणार असून जो संघ हा सामना जिंकेल तो मालिकेत आघाडी घेणार आहे.

Follow Us
कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांचा...
Delhi Police PC | कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद, थेट...
आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक
Ritu Tawade | आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक; वडाळ्यात भाविकांचा जनसागर!
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या...
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
चांगला पाऊस पडू दे... प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी प्रार्थना
चांगला पाऊस पडू दे... पुण्यातील प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी भाविकांची प्रार्थना
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत...
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत म्हणाले, रोज...
दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे... दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... 24 तासात 6 मोठे निर्णय
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... गेल्या 24 तासात दोन व्हिडीओ अन् 6 मोठे निर्णय, दिल्लीत काय घडतंय?
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान,
CM फडणवीसांच्या दिल्लीतील वर्णीबाबत अमृता फडणवीसांचं थेट विधान; म्हणाल्या, महाराष्ट्रात...
विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा Video पहाच
जय हरी विठ्ठल! यंदा विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळाला पाहण्यासाठी हा संपूर्ण Video पहाच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा
Pandharpur Ashadhi Mahapuja | ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषाने दुमदुमली पंढरी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडली शासकीय महापूजा