AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA, 1st ODI: अखेर पहिल्या वनडे मध्ये मुंबई-पुण्याच्या प्रमुख खेळाडूंना संधी नाहीच

आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माच्या (Rohit sharma) अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) संघाचे नेतृत्व करतोय. विराट कोहली प्रथमच एक सामन्य खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे.

IND vs SA, 1st ODI: अखेर पहिल्या वनडे मध्ये मुंबई-पुण्याच्या प्रमुख खेळाडूंना संधी नाहीच
| Edited By: | Updated on: Jan 19, 2022 | 2:01 PM
Share

पार्ल: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (India vs South Africa) आजपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु होत आहे. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माच्या (Rohit sharma) अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) संघाचे नेतृत्व करतोय. विराट कोहली प्रथमच एक सामन्य खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे. पहिल्या वनडेत महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला संधी मिळणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. तसंच घडलं. आहे. महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड ऐवजी पुन्हा एकदा अनुभवाला प्राधान्य देत शिखर धवनवर विश्वास दाखवण्यात आला आहे. खरंतर ऋतुराज सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

ऋतुराज गायकवाडचा परफॉर्मन्स विजय हजारे वनडे टुर्नामेंटमध्ये पाच सामन्यात ऋतुराज गायकवाडने चार शतक झळकावली आहेत. त्याने 600 पेक्षा अधिक धावा केल्या. त्याशिवाय आयीपएल 2021 मध्ये सुद्धा चौफेर फटकेबाजी करुन खोऱ्याने धावा वसूल केल्या आहेत. त्याचवेळी शिखर धवनने पाच सामन्यात फक्त 56 धावा केल्या आहेत. दोघेही सलामीवीर म्हणून खेळतात.

सूर्यकुमार यादवलाही स्थान नाही मधल्या फळीत मुंबईच्याच दोन खेळाडूंमध्ये स्पर्धा होती. सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर. टीम मॅनेजमेंटने अय्यरला संधी दिली आहे. त्यामुळे सूर्यकुमारला अजून वाट पहावी लागले. स्थानिक देशांतर्गत क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवनेही खोऱ्याने धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा तो प्रमुख खेळाडू आहे. वेंकटेश अय्यरने वनडेमध्ये डेब्यु केला आहे. ऑलराऊंडर म्हणून त्याचा संघात समावेश करण्यात आलाय.

ind vs sa south africa wins toss batting first Maharashtra ruturaj gaikwad & suryakumar yadav not included in side

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.